Operation Sindoor: दहशतवाद्यांचे ९ कॅम्प कसे उद्धवस्त केले? भारतील सैन्यदलाने दिली माहिती|VIDEO
नवी दिल्ली: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तनच्या भाडोत्री दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर गोळ्या झाडत त्यांची क्रूर हत्या केली. यानंतर भारताने अवघ्या पंधरा दिवसांत भारताने चोख प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर राबवले. या घटनेची सर्व माहिती आज भारतीय सैन्याच्या तीनही दलाच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.
एअर मार्शल ए.के. भारती यांनी सांगितले की, पहलगाममधील निंदनीय दहशतवादी घटनेनंतर भारतीय हवाई दलाने तात्काळ कारवाई सुरू केली. या कारवाईअंतर्गत ठरवलेल्या नऊ लक्ष्यांपैकी बहावलपूर आणि मुरीदके येथील कुख्यात दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे नष्ट करण्याची जबाबदारी भारतीय हवाई दलावर सोपवण्यात आली होती.
ही दोन्ही ठिकाणे पाकिस्तानच्या हद्दीत असूनही भारतीय हवाई दलाने ठरल्याप्रमाणे ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली. भारती यांनी स्पष्ट केले की, हवाई दलाने अचूकतेने आपले उद्दिष्ट पूर्ण केले असून दहशतवादी तळं पूर्णपणे नष्ट करण्यात आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.