Breaking News

Rahul Gandhi: ही चूक नाही तर गंभीर गुन्हा, देशाला सत्य...; ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधींचा सवाल

Rahul Gandhi On Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवर विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. ही चूक नाही तर गंभीर गुन्हा, देशाला सत्य समजलेच पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.
video

ऑपरेशन सिंदूरनंतर आता आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. विरोधकांकडून मोदी सरकारला अनेक सवाल विचारले जात आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना सवाल केला आहे. ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला आधीच का दिली? आणि आपण किती भारतीय विमानं गमावली?, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. तसंच, 'ही चूक नाही तर गुन्हा आहे. देशाला सत्य समजलंच पाहिजे', असं देखील राहुल गांधी यांनी सांगितलं.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले की, 'परराष्ट्रमंत्री जयशंकर मौन बाळगून सत्य सांगत नाहीयेत, हेच धोकादायक आहे. मी पुन्हा विचारतो पाकिस्तानला आधीच सांगितल्यामुळे भारताचं किती लढाऊ विमानं गमावली? ही चूक नाही, एक गंभीर गुन्हा आहे. देशाला सत्य समजलंच पाहिजे' या ट्विटद्वारे राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूरवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com