Ind Vs Pak : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही भारत-पाकिस्तान सामना होणार? पण कुठे आणि कधी?

India Vs Pakistan : काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढले होते. भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेटचे सामने खेळले जाऊ नये असे अनेकजण म्हणत होते.
Ind Vs Pak
Ind Vs Pakx
Published On

Ind Vs Pak Match : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ५ सप्टेंबरपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आशिया कप स्पर्धेमध्ये आमनेसामने येणार असल्याचे म्हटले जात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होणार नाही अशा चर्चा रंगल्या होत्या. पण आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान तीनवेळा आमनेसामने येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर रोजी आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाईल. तर १४ सप्टेंबर रोजी या संघांमध्ये दुसऱ्यांदा लढत होईल. आशिया कपला ५ सप्टेंबर रोजी सुरुवात होईल. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि यूएई असे सहा संघ सहभागी होतील. ही स्पर्धा एकूण १७ दिवस चालेल. २१ सप्टेंबर रोजी आशिया कपचा अंतिम सामना खेळला जाईल. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले, तर तिसऱ्यांदा ते आमनेसामने येतील.

Ind Vs Pak
Ind Vs Eng : जसप्रीत बुमराह आउट, आकाश दीप इन; दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियामध्ये ३ बदल

आशिया कप टी-२० स्वरुपामध्ये खेळवला जाणार आहे. यात तीन-तीन संघांचे दोन गट तयार केले जातील. सहापैकी चार संघ सुपर फोरमध्ये पोहोचतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत पाकिस्तान सामने होतील. याबाबत बीसीसीआयने अधिकृत माहिती दिलेली नाही. ते सामन्यांसाठी सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहेत, असे म्हटले जात आहे.

Ind Vs Pak
Ind Vs Eng : लीड्सपाठोपाठ टीम इंडिया बर्मिंगहॅममध्ये हरणार? इंग्लंडचा संघ पुन्हा वरचढ ठरणार? कारण...

काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रत्युत्तर देताना भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले केले. भारताने ड्रोन हल्ले परतवून लावले. यादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले. या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ क्रिकेटच्या मैदानावर परत एकत्र दिसणार नाही, असे म्हटले जात होते.

Ind Vs Pak
Kabaddi Player Death : प्रसिद्ध कबड्डीपटूचा दुदैवी मृत्यू, कुत्र्याच्या पिल्लाला वाचवणं जीवावर बेतलं

आशिया कपमध्ये भारताचा दबदबा राहिला आहे. आशिया कपच्या इतिहासात भारताने सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवले आहे. भारतीय संघ गतविजेता देखील आहे. भारताने श्रीलंकेच्या संघाने सहा वेळा आशिया कप जिंकला आहे. पाकिस्तानच्या संघाने दोनदा आशिया कप स्पर्धेची ट्रॉफी जिंकली आहे. आशिया कपसंबंधित अधिकृत माहिती लवकरच बीसीसीआयद्वारे शेअर केली जाईल.

Ind Vs Pak
Cricket : एक-दोन नाही तर अनेक...; भारतीय खेळाडूचा पाय अजून खोलात, शारीरिक शोषणाचे गंभीर आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com