Uddhav Thackeray: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाक सामना? उद्धव ठाकरेंचा संताप, जिल्हाप्रमुखांना दिल्या 'या' सूचना|VIDEO

No Cricket After Bloodshed: उद्धव ठाकरे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर संताप व्यक्त करत भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध दर्शवला. १४ सप्टेंबरला जोरदार आंदोलनाचे आदेश देत महायुतीतील भ्रष्टाचार उघड करण्याचे आवाहन केले.

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्हा प्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन करत सांगितले की, १४ तारखेला जोरदार आंदोलन करावे. तसेच निवडणुकीसाठी तयारी सुरू करावी आणि महायुतीतील नेत्यांमधील भ्रष्टाचार बाहेर काढावा.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिति निर्माण झाली होती. आणि त्यानंतर 14 तारखेला भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना होणार आहे. या सामन्याला ठाकरे गटाकडून विरोध पाहायला मिळत आहे. पहलगाममध्ये आपल्या माता भगिनींचा सिंदूर पुसला गेला तरी देखील हा सामना होत आहे. मोदींना हा सिंदूर पाठवावा. तसेच महायुतीतील मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढावे अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com