पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये शंभरहून अधिक दहशतवादी मारले गेले असल्याचे भारतीय सैन्य दलाने याबाबत माहिती दिली. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत या युद्धाला विराम लावला. यावर देशाचे जेष्ठ नेते शरद पवार प्रतिक्रिया देत म्हणाले, सिमला करारानुसार तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही असे पवार यांनी स्पष्ट केले.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने तातडीने सिंधु करार रद्द केला. वाघा-अटारी सीमा बंद केल्या. पाकिस्तानशी व्यापार देखील थांबवला. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. यानंतर अमेरिकेने मध्यस्थी करत शस्तरबंधी केली. यावर शरद पवार यांनी देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यात डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी योग्य नसल्याचे म्हटले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.