भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. यानंतर पाकिस्तानच्या सरकारने या दहशतवाद्यांच्या अंत्यविधिला गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला. मात्र आता पाकिस्तानच्या अधिकाऱ्याने मीडियासमोरच पुलवामा दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची कबुली दिली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसंघर्ष सुरू आहे यावेळीच असे विधान केल्याने जागतिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.
2019 मध्ये पुलवामा भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे 40 जवान शाहिद झाले होते. मात्र त्यावेळेस पाकिस्तानने हातवरती केले होते, आणि दहशतवाद आणि आमचा संबंध नसल्याचे तोंडवर करून सांगत असायचे. आता सहा वर्षांनंतर पाकिस्तानने ही कबुली दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.