
भरत मोहळकर, साम टीव्ही
मुंबई : ठाकरे गट फोडण्यासाठी पुन्हा राज्यात हालचाली सुरू झाल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाच्याच खासदारानं केलाय. पैशांचं आमिष दाखवलं जात असल्याचं या खासदाराचं म्हणणं आहे. ठाकरे गटावर कोणत्या पक्षाची नजर आहे? लोकसभेत बहुमातासाठी भाजपची काय रणनीती आहे? यावरचा हा विशेष रिपोर्ट.
राज्यात पुन्हा एकदा फोडाफोडीच्या चर्चांना उधाण आलंय. ठाकरे गट खिळखिळा करण्यासाठी भाजपकडून ठाकरेंच्या खासदारांना गळाला लावण्यासाठी पैशाचं आमिष दाखवून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याचा दावा खासदार संजय देशमुखांनी केलाय. तर दुसरीकडे भाजप कधीच फोडाफोडीचं राजकारण करत नसल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांच्या घरी ठाकरेंच्या खासदारांनी स्नेहभोजन केलं. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार फुटण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता भाजपलाही केद्रात इतर पक्षांच्या खासदारांना गळाला लावण्याची आवश्यकता का वाटते? पाहूयात.
केंद्र सरकार नितीश कुमार आणि चंद्रबाबूंच्या टेकूवर उभं
एकनाथ शिंदेंकडेही ७ खासदारांचं संख्याबळ, त्यामुळे शिंदेंकडून दबावाचं राजकारण
ठाकरे गटाकडे ८ खासदारांचं संख्याबळ
ठाकरेंचे खासदार गळाला लागल्यास शिंदेंची बार्गेनिंग पॉवर आणखी कमी होण्याची शक्यता
नितीश कुमारांनी बिहार निवडणुकीपूर्वी मणिपूर सरकारचा काढलेला पाठिंबा आणि शिंदेंकडून सुरु असलेलं दबावाचं राजकारण पाहता सरकार स्थिर करण्यासाठी भाजप खासदारांची जुळवा-जुळव करत असल्याची चर्चा आहे. मात्र ठाकरेंचे खासदार शिंदे गटाकडे जाणार, भाजपच्या गळाला लागणार की शिवबंधन बांधताना घेतलेलं वचन जपणार? हे पाहणं महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.