Kargil Vijay Diwas Saam Tv
लाईफस्टाईल

Kargil Vijay Diwas: पाकिस्तानला धूळ चारत भारताच्या 'या' सैनिकांनी जिंकलं कारगिल युद्ध ;शौर्य ऐकून आजही डोळ्यात येतं पाणी

Army Officers Story Who Died In Kargil War: आज कारगिल युद्धाला २५ वर्ष पूर्ण झाली आहे. कारगिल युद्धात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शूरवीर सैनिकांना भारत देश कधीच विसरु शकणार आहे. या सैनिकांनी या युद्धात विजय मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे.

Siddhi Hande

२६ जुलै १९९९ हा दिवस भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा ठरला. २५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारत- पाकिस्तान बॉर्डरवर कारगिल युद्ध झाले होते. भारतीय सैन्याने कारगिल युद्धात आपल्या प्राणांची आहुती दिली. भारताच्या या विजयाला आज २५ वर्ष पूर्ण झाली. या युद्धात ५२७ जवानांनी बलिदान दिले. या विजयासाठी ज्या सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

कॅप्टन विक्रम बत्रा

कॅप्टन विक्रम बत्रा यांना द्रासचा वाघ म्हणून ओळखले जाते. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्यांनी कारगिल युद्धात आपले प्राण गमावले. त्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले . त्यांना कारगिल हिरो म्हणून आजही ओळखले जाते. त्यांच्या आयुष्यावर आधारित शेरशाह हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे.

लेफ्टनंट बलवान सिंग

लेफ्टनंट बलवान सिंग यांना 'टायगर ऑफ टायगर हिल' असेही म्हटले जाते. त्यांनी टायगर हिल ताब्यात घेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी या मोहिमेची जबाबदारी स्वतः च्या खांद्यावर घेतली होती. त्यांना त्यांच्या शौर्यासाठी महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते.

ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव

योगेंद्र सिंह यादव हे परमवीर चक्र प्राप्त करणारे सर्वात तरुण सैनिक होते. त्यांना ऑगस्ट १९९९ मध्ये परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. कारगिल युद्धात त्यांच्या रेजिमेंटने टोलोलिंग टॉपवर कब्जा केला. यामध्ये २१ सैनिक शहीद झाले होते.

लेफ्टनंट मनोजकुमार पांडे

लेफ्टनंट मनोजकुमार पांडे यांनी कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना शौर्य पुरस्कार, परमवीर चक्राने सन्मानित करावे, अशी त्यांची इच्छा होती, असे त्यांच्या वडिलांनी सांगितले. त्यांनी या युद्धात आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार, परमवीर चक्र या पुरस्काराने सन्मानित केले.

संजय कुमार

संजय कुमार यांनी कारगिल युद्धात मुश्कोह व्हॅलीमधील पॉइंट ४८७५ शिखरावर कब्जा करण्याचे काम केले. त्यांनी या युद्धात स्वतः चे प्राण गमावले. त्यांच्या या बलिदानाला भारत देश कधीच विसरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business Idea: कार नसतानाही करा OLA-Uberसोबत व्यवसाय; दरमहा कमवा बक्कळ पैसा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Banana Chips: वेफर्स खाताय सावधान! तुम्ही खाताय सडलेल्या केळीचे वेफर्स

Mumbai Ahmedabad Bullet Train: समुद्राखालून ३२० किमी वेगाने धावेल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, जाणून घ्य कसा असेल मार्ग

Shocking : ३१ वर्षांच्या तरुणाने केली हद्दपार, १००० महिलांसोबत शरीरसंबध, पण आता...; जगभरात होतेय चर्चा

NEET Exam: 'नीट'चं टेन्शन, विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन; विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT