
परभणी : पिकांना सुरक्षा कवच म्हणून राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा योजना आणली आहे. ही योजना अमलात आणली असली तरी शेतकरी रब्बी हंगामातील पिकांचा पीक विमा (Crop Insurance) काढण्यासाठी शेतकरी पुढे येत नसल्याचे चित्र परभणी (Parbhani) जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. विमा काढल्यानंतरही शेतकऱ्यांना मोबदला मिळत नसल्याचे हे चित्र निर्माण झाले आहे. (Live Marathi News)
राज्य शासनाने खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगाम २०२३-२४ साठी सर्वसमावेशक पीक विमा योजना अमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून आपली पिके संरक्षित करण्यासाठी केवळ एक रुपया घेतला जाणार आहे. तरीही परभणी जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचा विमा उतरविण्यास (Farmer) शेतकरी धजावत नसल्याचे दिसून येत आहेत. ९ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील केवळ ७ हजार ७५३ शेतकऱ्यांनीच आपल्या पिकांचा विमा उतरवल्याचे जिल्हा प्रशासनाकडून माहिती देण्यात आली,
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
खरीप हंगामात दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे ५२ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना अग्रीम लागू झाले आहे. या अग्रीमची भरपाई ही शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर येत आहे. रब्बी हंगामातही शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकांचे विमा महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपली पिके संरक्षित करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.