
संजय राठोड
यवतमाळ : सततची नापिकी, वाढणारा कर्जाचा बोज्यातून शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहे. यंदा कमी (Yavatmal) पाउस झाल्याने शेतातील पिकांमधुन मिळणाऱ्या उत्पन्नात घाट झाल्याने विषारी द्रव्य प्राशन करून (Farmer) शेतकऱ्याने जीवन संपविल्याची घटना यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील मोख येथे घडली आहे. (Maharashtra News)
यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील मोख येथील रहिवाशी बाळू चव्हाण असे शेतकऱ्याचे नाव आहे. बाळू चव्हाण यांनी शेतीसाठी दिड लाख रुपयांचे बॅकेचे कर्ज काढले होते. यात यंदा पाऊस (Rain) कमी झाल्याने अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. यामुळे यंदा कापूस आणि सोयाबीन उत्पादनात पन्नास टक्के घट झाल्याने बाळू चव्हाण हे चिंतेत होते. याच चिंतेतून मोख इथे शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात विषारी औषध प्राशन करून जीवन संपविले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तीन लहान मुले झाली अनाथ,
सततच्या नापिकीला आणि अंगावर असलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या चिंतेतून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे तीन लहान मुले अनाथ झाली आहेत. दोन लहान मुलं, एक मुलगी, पत्नी आणि आई- वडील असा मृतकच्या पाठीमागे परिवार आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.