Jhelum river flood Pakistan : पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये झेलम नदीच्या पाण्यामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने भारतावर कोणतीही पूर्वसूचना न देता नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे हट्टियन बाला परिसरात आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. मशिदींमधून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, भारताने सिंधु जल कराराचे उल्लंघन केले आहे. या घटनेमुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. भारताने अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
पाकिस्तानच्या मुझफ्फुराबादमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. मुझफ्फुराबादमध्ये पूरस्थिती तयार झाली असून या परिस्थितीसाठी पाकिस्तानने भारताला जबाबदार ठरलं आहे. झेलम नदीतून कोणतीही पूर्वसूचना न देता भारताने मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याने पाकिस्तानात पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानमध्ये सध्या आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.