युद्धबंदीनंतरही शेपूट वाकडंच असणाऱ्या पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. दहशतवादाच्या नांग्या ठेचल्यानंतर कुरापतखोर पाकिस्तानची खोड मोडणाऱ्या भारतानं आता नवा डाव टाकण्याची तयारी केली आहे. भारताच्या जोरदार प्रहारानंतर गुडघ्यावर आलेल्या पाकिस्तानला अद्दल घडवण्याची एकही संधी भारत सोडणार नाही असंच दिसत आहे.
पाकिस्तानला भारतासोबत संबंध सुधारायचे असतील तर त्यांना त्यांची विश्वसनीयता सिद्ध करावी लागणार आहे. पाकिस्ताननं काही दहशतवाद्यांचे प्रत्यार्पण करावे, असा आग्रह भारत करू शकतो. त्यामध्ये हाफिज सईद, मसूद अजहर, दाऊद इब्राहिमला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी लवकरच पाककडे करण्यात येणार आहे. हाफिज सईद हा 2008 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे. मसूद अजहर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आहे. पुलवामा आणि इतर हल्ल्यांशी त्याचा संबंध आहे. तर, दाऊद इब्राहिम हा 1993 चे मुंबई बॉम्बस्फोट आणि इतर गुन्ह्यांसाठी भारताला हवा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.