
आयपीएल २०२५ चा ३१ वा सामना आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये रोमांचकारी ठरला. मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सचा संघ अवघ्या ९६ धावांवर गारद झाला. कर्णधारपदाची जबाबदारी उत्तमपणे संभाळत श्रेयस अय्यरने हा सामना जिंकला.
पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कोलकाताच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत संपूर्ण पंजाब संघाला फक्त १११ धावांवर रोखलं. इतकं कमी धावांवरही पंजाबने हा सामना जिंकला. पंजाबच्या गोलंदाजांनीही शानदार गोलंदाजी करत कोलकाताला फक्त ९६ धावांत गुंडाळले. केकेआर संघाचा पराभव कसा झाला काय आहेत कारणं हे जाणून घेऊ.
क्विंटन डी कॉकचा फॉर्म केकेआरसाठी डोकेदुखी बनला आहे. तो अद्याप संघाला चांगली सुरुवात देऊ शकलेला नाहीये. या हंगामात त्याने ७ सामन्यांमध्ये फक्त १४३ धावा केल्या. पंजाब विरुद्धच्या सामन्यातही तो ४ चेंडूत फक्त २ धावा करू शकला. त्याचा असा फॉर्म केकेआरच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण होते.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात रहाणेने १७ चेंडूत १७ धावा केल्या. या डावात तो चांगल्या लयीत दिसत होता. पण फलंदाजी करताना तो चहलच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला म्हणजेच पायचीत झाला. यावेळी त्याला डीआरएस घेण्याची संधी होती, पण त्याने डीआरएस घेतला नाही. त्याचा फटका संघाला बसला कारण रिप्लेमध्ये रहाणे बाद नसल्याचे दाखवले गेले होते. अंगकृष्ण रघुवंशी यांनीही त्यांना डीआरएस घेण्यास सांगितले होते, पण त्यांनी त्याचे ऐकले नाही. शेवटी केकेआरला पराभव सहन करावा लागला.
केकेआरची खालची आणि मधली फळी डाव सावरण्यात अपयशी ठरत आहे. बऱ्याच काळापासून ही फळी संघर्ष करत आहे. या सामन्यातही केकेआरचा खालचा आणि मधला क्रम पूर्णपणे अपयशी ठरला. रिंकू सिंग (२), वेंकटेश अय्यर (७) आणि रमणदीप सिंग (०) हे खेळाडू अपयशी ठरले. यामुळेही केकेआरला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.