
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. या कारवाईनंतर पाकिस्तानकडून सलग तीन दिवस शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतावर हल्ले करण्यात आले. मात्र, भारतीय लष्करानेही प्रभावी प्रतिहल्ला करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.
अशातच आसाममध्ये देशद्रोह्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. आसाम पोलिसांनी पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशद्रोह्यांविरोधात कारावाई केली आहे.
भारत पाकिस्तानमधील स्थिती चिघळलेली असताना आसाममध्ये काही लोकांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ काही पोस्ट शेअर केल्या होत्या. याप्रकरणामुळे आसाममधील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. पोलिसांनी तातडीने २ जणांना अटक केली असून, आतापर्यंत एकूण ५० जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे आमदार अमिनुल इस्लाम यांनाही देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्सवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. देशद्रोह्यांविरोधात आमची कारवाई सुरूच आहे. आतापर्यंत ५० देशद्रोह्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आपण अशा आणखी देशद्रोहींना शोधून काढू आणि त्यांच्याविरोधात कारवाई करू, अशा आशयाचे पोस्ट त्यांनी शेअर केले होते.
आसाम पोलिसांच्या सायबर सेल आणि विशेष पथकाने सोशल मीडियावर लक्ष ठेवून पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या पोस्ट करणाऱ्यांची माहिती गोळा केली. याच अनुषंगाने बिश्वनाथ जिल्ह्यातील जब्बुर इस्लाम आणि मोरीगाव जिल्ह्यातील रूहुल अमीन यांना अटक करण्यात आली. या घटनेनंतर आसाममधील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.