बिहारमधील सरकारी शाळेच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाच्या माध्यमिक शिक्षण कार्यालयाने राज्यातील सर्व सरकारी शाळांच्या कार्यकाळात सुधारणा करत शनिवारी 'हाफ डे' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील गुरुवारी माध्यमिक शिक्षण संचालक सज्जन आर यांच्या स्वाक्षरीने आदेश देण्यात आला आहे. विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार 12 डिसेंबर 2025 रोजी काढलेल्या आधीच्या आदेशात सुधारणा करण्यात आली आहे. नवीन नियमांनुसार सोमवार ते शुक्रवार शाळा पूर्वीप्रमाने सकाळी 9.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र शनिवारी शाळा सकाळी 9.30 ते 1वाजेपर्यंत चालणार आहेत.
प्राथमिक आणि माध्यमिक इयत्ता पहिली ते आठवी शाळांमध्ये सकाळी 9.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वर्ग आणि नियोजित उपक्रम होतील. त्यानंतर 12 ते 12.40 या वेळेत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाईल आणि लगेचच सुट्टी जाहीर केली जाईल. तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक इयत्ता 9 ते 12 शाळांमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत अध्यापन आणि इतर शैक्षणिक उपक्रम होतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडून दिले जाईल.
शिक्षण विभागाने शिक्षकांच्या शैक्षणिक कामांबाबतही महत्वाचे निर्देश दिले आहेत. या आदेशानुसार शिक्षकांना दररोज शाळा संपल्यानंतर एक तास काम करणे बंधनकारक असेल. या काळात ते पुढील दिवस आणि आठवड्याचे प्लॅन तयार करतील. विद्यार्थ्यांच्या गृहपाठाची तपासणी करतील तसेच प्रयोगशाळा व्यवस्थापनासारखी कामे पार पडतील.
हे सर्व शैक्षणिक काम किंवा रेमेडियल क्लासेस पूर्ण केल्यानंतरच शिक्षकांना शाळा सोडण्याची परवानगी असेल. विभागाने स्पष्ट केले आहे की, इतर सर्व अटी पूर्ववत राहतील. या निर्णयामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शनिवारी ‘हाफ डे’ असल्याने विद्यार्थ्यांना आठवड्याच्या शेवटी मानसिक विश्रांती मिळणार आहे. त्याचबरोबर शिक्षकांनाही पुढील आठवड्याच्या अभ्यास आणि मूल्यांकनाची तयारी करण्यासाठी अधिक वेळ मिळणार असल्याने या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.