swabhimani shetkari sanghatana to take kaifiyat yatra from kagal to kolhapur on 26 June declares raju shetti
swabhimani shetkari sanghatana to take kaifiyat yatra from kagal to kolhapur on 26 June declares raju shetti Saam Digital
महाराष्ट्र

Raju Shetti News : सरकारने शेतक-यांना दिलेल्या शब्द पाळला नाही, 'स्वाभिमानी'ची आता कागल ते काेल्हापूर कैफियत यात्रा : राजू शेट्टी

Siddharth Latkar

सरकारने शेतक-यांना दिलेल्या शब्द पाळलेला नाही. सध्या जाहीर केलेला हमीभाव ही केवळ ॲडजस्टमेंट आहे. सबसिडी देऊन भाव नियंत्रित करत असल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घ्याव्यात यासाठी येत्या 26 जूूनला कागल ते काेल्हापूर अशी कैफियत यात्रा काढणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज (शुक्रवार) काेल्हापूर येथे माध्यमांशी बाेलताना दिली.

राजू शेट्टी म्हणाले मागील वर्षी तुटलेल्या ऊसाचा एफआरपी अधिक 100 रुपये मिळावेत अशी आमची मागणी होती. त्यासाठी संघटनेसमवेत शेतक-यांनी महामार्ग रोखला. ज्या कारखान्याने तीन हजार रुपये दिले त्यांनी जादा पन्नास रुपये शेतकऱ्यांना द्यायचे अशी मागणी ठरली हाेती. त्यावेळी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

स्वाभिमानीच्या आंदोलन काळात पोलिसांनी कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल केले. कार्यकर्त्यांवर अन्याय केला पण सरकारने दिलेले शब्द पाळलेला नाही अशी खंत राजू शेट्टींनी व्यक्त केली.

दरम्यान जिल्हाधिकारी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा शतकोत्तर जयंती कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या जयंतीनिमित्त ऊस बाधित शेतकरी आणि शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची कैफियत मांडणार आहोत. त्यासाठी कागल ते काेल्हापूर ( छत्रपती शाहू महाराज स्मृती स्थळ) अशी 26 जूनला पदयात्रा काढणार आहाेत.

सदाभाऊ खोतांना टाेला

दरम्यन राजू शेट्टी यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सदाभाऊ खाेत यांचा नामाेल्लेख टाळत ज्यांचा चळवळशी संबंध नाही त्यांनी चळवळीवर बोलू नये असा टाेला हाणला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Mumbai News : DRI ने केला रक्तचंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल आठ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त

Pani Puri and Cancer : पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो कर्करोग? वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणाले?

Mumabi Traffic: अनंत-राधिकाचा शाही विवाह सोहळा; पाच दिवसांसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल

SCROLL FOR NEXT