Maratha Aarkshan Latest News:  Saamtv
महाराष्ट्र

Maratha Reservation: सरकारला दिलेला अल्टिमेटम संपणार! जरांगे पाटलांची पुढील रणनिती काय? 'शांतता रॅली'मधून भूमिका मांडणार

Maratha Aarkshan Latest News: आज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम संपत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार? पुढील रणनिती काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Gangappa Pujari

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम आज संपत आहे. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला १३ जुलैचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे आज मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी लक्षवेधी लढा उभारलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला अंतिम अल्टिमेटम दिला होता. आज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम संपत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार? पुढील रणनिती काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकीकडे विधानपरिषदेच्या निवडणुकीचा जल्लोष सुरू असतानाच आता मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमकपणामुळे राज्य सरकारसमोर नवा पेच उभा राहिला आहे. तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी बांधवही आक्रमक झाले आहेत. विधानसभा तोंडावर असताना ओबीसी- मराठा संघर्ष टाळण्यासाठी यावर तोडगा काढण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे.

दरम्यान, आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली होणार आहे. जरांगे पाटील यांच्या या रॅलीमध्ये हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन शहराची लाईफ लाईन असलेला जालना रोड सकाळी 9 वाजेपासून बंद ठेवण्यात आलाय तर शहरातील 500 शाळा आणि 50 पेक्षा अधिक महाविद्यालय यासह जालना रोडवरील खाजगी दुकाने आणि आज स्थापना यावर याचा परिणाम होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT