Shravan 2024 SAAM TV
लाईफस्टाईल

Shravan 2024 : श्रावणात उपवासाला करा 'या' मिठाचा वापर, फायदे वाचून व्हाल थक्क!

Fasting Tips : जुलै महिना येताच सणासुदीला सुरुवात होते आणि सण म्हटलं की, उपवास आलाच. हिंदू संस्कृतीत श्रावणी सोमवारच्या उपवासाला विशेष महत्व दिले जाते. त्यामुळे उपवासात पांढऱ्या मीठाचा वापर टाळा आणि सैंधव मीठाचा वापर करा.

Shreya Maskar

हिंदू धर्मामध्ये उपवासाला खूप महत्व आहे. उपवासाचे नियम काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे यावर त्यांचा भर असतो. उपवासाच्या दिवशी शुद्ध पदार्थ खाल्ले जातात. त्यामुळे उपवासात मिठाचा वापर करताना देखील विशेष खबरदारी घ्यावी लागते. श्रावणातील उपवासात पांढऱ्या मिठाचा वापर टाळावा आणि सैंधव मिठाचा वापर करावा. कारण सैंधव मीठ हे उपवासासाठी शुभ आणि शुद्ध मानले जाते.

पांढऱ्या मिठाचा वापर टाळा

उपवासात बऱ्याच ठिकाणी पांढऱ्या मिठाचा वापर केला जातो. मात्र हे शास्त्रानुसार चुकीचे आहे. कारण पांढऱ्या मीठ तयार करण्यासाठी त्यावर प्रक्रिया केली जाते. अनेक पदार्थांचा त्यात समावेश असतो. जे उपवासाला योग्य नाही. कारण उपवासाच्या दिवशी शुद्ध पदार्थांचे सेवन केले जाते. उपवासात मोठ्या प्रमाणात सैंधव मीठाचा वापर केला जातो.

सैंधव मीठ

उपवासाच्या पदार्थांमध्ये सैंधव मीठ घातले जाते. यामुळे पदार्थाला चव येते आणि उपवासही शुद्ध पद्धतीने पार पडतो. हे मीठ गुलाबी रंगाचे असून व्रताच्या खाद्यपदार्थांमध्ये शुभ मानले जाते. सैंधव मीठ हे नैसर्गिक रित्या आढळते. या मिठावर एका मर्यादेपर्यंत प्रक्रिया केली जात असल्यामुळे यातील पोषक घटक टिकून राहतात.

सैंधव मिठाचे फायदे जाणून घ्या

डिहायड्रेशनचा धोका टळतो

सैंधव मीठाच्या सेवनामुळे उपवासात डिहायड्रेशनचा धोका टळतो. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास सैंधव मीठ मदत करते. तुम्ही उपवासात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांवर हे मीठ टाकू शकता.

पचनक्रिया सुरळीत

श्रावण पावसाळ्यात येत असल्यामुळे पचनक्रिया संबंधित अनेक समस्या उद्भवतात. अशात सैंधव मीठाचा जेवणात वापर केल्यास मंदावलेली पचनक्रिया सुरळीत होऊन अपचनाची समस्या उद्भवत नाही. बद्धकोष्ठता, ॲसिडीटीचा त्रास कमी होतो. उपवासात छातीत जळजळ होत असल्यास लिंबाच्या रसामध्ये थोडे सैंधव मीठ घालून प्यावे. छातीत जळजळ तसेच पोटातील मळमळ दूर होईल.

वजन नियंत्रणात

सैंधव मीठामुळे भूक नियंत्रणात राहून वजन कमी होण्यास मदत मिळते. तसेच पोटाची चरबी देखील कमी होते.

रक्तदाब नियंत्रणात

ज्या लोकांना ब्लड प्रेशरची समस्या आहे. त्यांनी उपवासाला जेवणात सैंधव मीठाचा वापर करावा. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT