अंबरनाथमधील रिक्षा युनियनचे नेते मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. एक आठवड्यापूर्वी रिक्षाचालकांचा शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत शहरातील खड्डे बुजवण्याची मागणी केली होती. मात्र आठवडा उलटूनही खड्डे बुजवण्यात न आल्यामुळे अखेर संतप्त रिक्षाचालकांनी आज अंबरनाथ नगरपालिकेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. मात्र यानंतरही पालिकेकडून कुणीही या रिक्षाचालकांशी चर्चा करण्यासाठी आलं नाही. शहर अभियंता राजेश तडवी यांनी समोर येऊन उत्तर द्यावं, अशी मागणी रिक्षाचालकांनी केली.
मात्र, तडवी हे पालिकेत उपस्थित नसल्यामुळे संतप्त रिक्षाचालकांनी आक्रमक पवित्रा घेत अंबरनाथ नगरपालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला आणि मोठी घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस आणि पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवल्याने अनर्थ टळला. जोपर्यंत पालिकेकडून खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलं जात नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका या रिक्षाचालकांनी घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.