Abdul Basit controversial statement on India latest news : आखाती देशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासितने भारताबाबत एक अत्यंत वादग्रस्त विधान केलंय. "जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला. तर, पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून भारताला लक्ष्य केले पाहिजे. मुंबई आणि दिल्लीसारख्या भारतीय शहरांवर बॉम्बफेक करावी, असं वादग्रस्त विधान बासितने केलंय त्यामुळे राजनैतिक वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जातोय.
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. दहशतवादी कारवायामुळे भारताने वारंवार पाकिस्तानला इशारा दिला आहे. त्यातच अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेकडून पाकिस्तानचे इरादे जगजाहीर केले होते. पाकिस्तान नवं शस्त्र तयार करत असून त्याचा अमेरिकेला धोका असल्याचे गुप्तचर संघटनेच्या रिपोर्टमधून समोर आले होते. त्यातच आता पाकिस्तानच्या बासितच्या वक्तव्याने नवा वाद उफळला आहे. बासितच्या वक्तव्याला भारताकडून प्रत्युत्तर काय दिले जाणार, याबाबत सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.