पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताकडून अनेक कठोर निर्णय घेतले गेले. भारताने पाकिस्तानवर वॉटर स्ट्राइक, डिजिटल स्ट्राइक करत पाकिस्तानला चांगलेच लोळवले आहे. भारताने 1965 साली झालेला सिंधु जलवाटप करार स्थगित करण्यात आला आहे. त्यानंतर भारताने पाकिस्तानला जाणारे पाणी अडवण्यास सुरुवात केली होती. यामुळे पाकीतस्तानला मोठा दणका बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताने चिनाब नदीवरील बगलिहार धरणातील पाणी रोखले होते. या धरणासोबतच भारताकडून झेलम नदीवरील किशनगंगा धरणातील पाण्याचा प्रवाह रोखले होते. आता मात्र या सगल्यामुळे पाकिस्तानच्या नद्या कोरड्या पडल्या आहे. एका महिन्यातच अशी अवस्था झाल्याने पाकिस्तानवर आता पाण्यासाठी वणवण फिरायची वेळ आली आहे.
ही पाण्याची स्ट्राइक भारत कायम ठेवण्याची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.