भारताच्या नंदनवन असलेल्या जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात 22 एप्रिल रोजी पाकिस्तानच्या भाडोत्री दहशतवाद्यांनी हल्ला करत निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी घेतला. त्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही संरक्षणदलासोबत बैठकीचे सत्र सुरू केले आहे. मोदी यांनी आपला रशिया दौरा देखील रद्द केला आहे. या हल्ल्याचा NIA पहलगाम येथे जाऊन घटनेची चौकशी करत आहे.
यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या अनेक सैनिकांनी आपला राजीनामा दिल्यामुळे पाकिस्तानला घाम फुटल्याचे सांगितले जात आहे. भारतीय नौदलाचं INS सूरत हे आता पाकिस्तानच्या फक्त 700 किमी इतक्या अंतरावर पोहोचले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. कराची बंदरापासून काही अंतरावर असलेल्या गुजरातच्या हाजी बंदरावर INS सूरत सर्व सामान्यांना बघण्यासाठी तेथे दाखल झाल्यामुळे पाकिस्तानला आता धडकी भरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.