जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे जालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशातील 28 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. डोळ्यासमोर आपल्या संख्यांना गामाववं लागतं याचं दु:ख काय असतं हे तेथील पर्यटकांनी अनुभवले. महाराष्ट्रातील नागरिकांचे पार्थिव आणण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरला गेले होते. यावेळी त्यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. येथे असलेल्या सर्वाना त्यांच्या घरच्यांची ओढ लागली आहे. आज काश्मीर बंद पुकारला असला तरी उद्यापासून सर्व सुरळीत होईल कारण काश्मीरकरांचा हा पोटाचा प्रश्न आहे. पण पाकिस्तान कुरघोड्या घालत आहे. पण आम्ही त्यांना भीक घालणार नाही जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा त्यांनी दहशतवाद्यांना दिला. तसेच काश्मीर हा आपला मुकुटमणी आहे असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.