Team India Captain: रोहितनंतर कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार? दिग्गज खेळाडूने सुचवले हे 2 पर्याय

Dinesh Karthik On Team India Captaincy: रोहित शर्माने काही दिवसांपूर्वी टी-२० संघाचं कर्णधारपद सोडलं आहे. दरम्यान तिन्ही फॉरमॅटसाठी कोण होणार भारतीय संघाचा कर्णधार? यासाठी दिनेश कार्तिकने पर्याय सुचवले आहेत.
Team India Captain: रोहितनंतर कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार? दिग्गज खेळाडूने सुचवले हे 2 पर्याय
team indiayandex
Published On

Team India's Next Captain After Rohit Sharma: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने जेतेपदाला गवसणी घातली होती. ही स्पर्धा झाल्यानंतर रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे सूर्यकुमार यादवला टी-२० संघाचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. तर रोहित शर्मा अजूनही वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार आहे. रोहित येत्या काही वर्षात वनडे आणि कसोटी क्रिकेटलाही रामराम करु शकतो. दरम्यान दिनेश कार्तिकने भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी २ पर्याय सुचवले आहेत.

Team India Captain: रोहितनंतर कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार? दिग्गज खेळाडूने सुचवले हे 2 पर्याय
Team India News: सरफराज खानला संधी मिळणं कठीण! 2863 रन्स करणाऱ्या या फलंदाजाला मिळणार स्थान

क्रिकबझच्या एका कार्यक्रमात दिनेश कार्तिकला प्रश्न विचारण्यात आला होता की, भारतीय संघाचा ऑल फॉरमॅट कर्णधार कोण असेल? या प्रश्नाचं उत्तर देताना दिनेश कार्तिक म्हणाला की,' माझ्या डोक्यात २ युवा खेळाडू आहेत. त्यांच्याकडे ते कौशल्य आहे, ते तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करु शकतात. पहिला आहे रिषभ पंत आणि दुसरा शुभमन गिल. दोघेही आयपीएल संघांचे कर्णधार आहेत आणि दोघांनाही भारतीय संघाचं नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. मला तरी हेच वाटतं की, योग्य वेळ आल्यानंतर दोघांकडेही भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी असणार आहे.'

सध्या सूर्यकुमार यादव भारतीय टी-२० संघाचा कर्णधार आहे. तर रोहित शर्मा वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करतोय. रिषभ पंत आणि शुभमन गिलबद्दल बोलायचं झालं, तर गिल आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व करतोय. तर रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व करतोय. त्यामुळे दोघांनाही नेतृत्वाचा अनुभव आहे.

Team India Captain: रोहितनंतर कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार? दिग्गज खेळाडूने सुचवले हे 2 पर्याय
Team India Selector: BCCI ची मोठी घोषणा! टीम इंडियाच्या माजी विकेटकीपरला बनवलं सिलेक्टर

भारत- बांगलादेशमध्ये रंगणार कसोटी मालिका

येत्या १९ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे . या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

या मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येईल. मात्र कसोटी मालिकेसाठी उप कर्णधारपदाची निवड करण्यात आलेली नाही. यापूर्वी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचा उपकर्णधार होता. मात्र त्याच्या नावापुढे उपकर्णधार असा उल्लेख करण्यात आलेला नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com