मुंबई : बांगलादेश विरोधात सुरु असलेल्या कसोटी मालिकेनंतर टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. बीसीआयआयने या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. १५ खेळाडूंच्या संघाची बीसीआयआयने शनिवारी रात्री उशिरा घोषणा केली.
बांगलादेशविरोधातील टी २० मालिकेसाठी संघात दोन नव्या खेळाडूंना संघात स्थान मिळालं आहे. तर एका गोलंदाजाची ३ वर्षानंतर भारतीय संघात स्थान मिळालं आहे. मात्र, संघात ईशान किशनला स्थान मिळालं नाही. त्यामुळे टीम इंडियात पदार्पण करण्यासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. आयपीएलमध्ये फलंदाजांची झोप उडवणाऱ्या जलद गोलंदाज मयंक यादवला संघात पहिल्यांदा स्थान मिळालं आहे. तर अष्टपैलू नीतीश कुमार रेड्डी यांना देखील पहिल्यांदा संघात स्थान मिळालं आहे.
भारत आणि बांगलादेशमध्ये ६ ऑक्टोबरपासून टी२० सामन्यांची मालिका सामने सुरु होणार आहे. या मालिकेत ३ सामने होणार आहेत. मालिकेनंतर टी२० संघ दोन महिन्यांनी मैदानात उतरणार आहे. याआधी टी२० संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी गौतम गंभीरकडे प्रशिक्षकपद आणि सूर्यकुमार यादवकडे कर्णधार पद होतं. त्याच मालिकेतील काही खेळाडूंना पुन्हा संधी मिळाली आहे. तर शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, ऋषभ पंत, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराजला संघात स्थान मिळालं नाही. ते कसोटी मालिकेत खेळत असल्याने त्यांना विश्रांती देण्यात आल्याचं समजतंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.