Team India Announced: टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमारकडे कर्णधारपदाची जबाबदारी, संघात कोणाला मिळाली संधी? वाचा

Team india squad announced for T20I series :बांगलादेशविरोधात टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
Team India News
team indiayandex
Published On

मुंबई : बांगलादेश विरोधात सुरु असलेल्या कसोटी मालिकेनंतर टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. बीसीआयआयने या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. १५ खेळाडूंच्या संघाची बीसीआयआयने शनिवारी रात्री उशिरा घोषणा केली.

बांगलादेशविरोधातील टी २० मालिकेसाठी संघात दोन नव्या खेळाडूंना संघात स्थान मिळालं आहे. तर एका गोलंदाजाची ३ वर्षानंतर भारतीय संघात स्थान मिळालं आहे. मात्र, संघात ईशान किशनला स्थान मिळालं नाही. त्यामुळे टीम इंडियात पदार्पण करण्यासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. आयपीएलमध्ये फलंदाजांची झोप उडवणाऱ्या जलद गोलंदाज मयंक यादवला संघात पहिल्यांदा स्थान मिळालं आहे. तर अष्टपैलू नीतीश कुमार रेड्डी यांना देखील पहिल्यांदा संघात स्थान मिळालं आहे.

Team India News
Cricket Records: T20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकणारे क्रिकेटपटू

भारत आणि बांगलादेशमध्ये ६ ऑक्टोबरपासून टी२० सामन्यांची मालिका सामने सुरु होणार आहे. या मालिकेत ३ सामने होणार आहेत. मालिकेनंतर टी२० संघ दोन महिन्यांनी मैदानात उतरणार आहे. याआधी टी२० संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी गौतम गंभीरकडे प्रशिक्षकपद आणि सूर्यकुमार यादवकडे कर्णधार पद होतं. त्याच मालिकेतील काही खेळाडूंना पुन्हा संधी मिळाली आहे. तर शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, ऋषभ पंत, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराजला संघात स्थान मिळालं नाही. ते कसोटी मालिकेत खेळत असल्याने त्यांना विश्रांती देण्यात आल्याचं समजतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com