
Pahalgam Terror Attack : काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे मंगळवारी (२२ एप्रिल) दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये २८ जणांचा जीव गेला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामध्ये अनेकजण जखमी झाले. हल्ल्यानंतर केंद्र सरकार ॲक्शन मोडवर आले. भारताने पाकिस्तानसोबतच्या सिंधू जल कराराला स्थगिती दिली. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारत सरकारकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पुरावा मागितला. दुबईमध्ये पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला, 'हल्ला झाला आणि लगेच त्यांनी पाकिस्तानच या हल्ल्यासाठी कारणीभूत आहे असे मानले. हा हल्ला पाकिस्तानने केला याचा पुरावा सादर करा. भारताने कोणताही पुरावा न देता पाकिस्तानवर आरोप केले आहेत. भारताची भूमिका चुकीची आहे'
शाहिद आफ्रिदीने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतकांबद्दल दु:ख व्यक्त केले. यात पाकिस्तानचा हात नाहीये. दहशतवादाला कोणताही धर्म पाठिंबा देत नाही. दोन्ही देशातील समस्यांवर संवाद साधायला हवा. संघर्षाने कोणाचाही फायदा होणार नाही. संवाद साधून आपण समस्या सोडवू शकतो असे वक्तव्य आफ्रिदीने केले.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल कराराला पहिल्यांदाच स्थगिती दिली. अटारी सीमा बंद करण्यात आली. भारतातील पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले. भारताकडून पाकिस्तानी राजनायिकांवर कारवाई करण्यात आली, उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली. अशा प्रकारे भारत सरकारने पाकिस्तानची कोंडी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.