
आयपीएल २०२५ स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मुंबईतील बीसीसीआय हेडक्वार्टरमध्ये सर्व संघांच्या कर्णधारांची मिटींग पार पडली. या मिटींगमध्ये आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी लागू करण्यात आलेल्या नव्या नियमांबाबत माहिती देण्यात आली आहे. कोणता आहेत ते नियम? जाणून घ्या.
आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी नवा नियम लागू करण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार, धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला २ नवीन चेंडूंनी खेळण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी दोन्ही डावात खेळाडूंना प्रत्येकी १-१ चेंडू वापरण्याची अनुमती होती. मात्र आता नव्या नियमानुसार, दुसऱ्या डावातील ११ वे षटक झाल्यानंतर दुसऱ्या नव्या चेंडूंचा वापर केला जाईल.
त्यामुळे मैदानावर असलेल्या दवाचं प्रमाण कमी होईल आणि खेळात समतोल राखता येईल. या नियमामुळे नाणेफेक जिंकून दुसऱ्या डावात फलंदाजी घेण्याचा निर्णय घेणाऱ्या संघांना जो फायदा होत होता, तो आता कुठेतरी कमी होणार आहे.
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, दुसऱ्या डावात पूर्ण नवीन चेंडू मिळणार की सेमी न्यू चेंडू? दुसऱ्या डावात नवा चेंडू मिळाल्याचा जितका फायदा आहे तितका तोट देखील आहे. कारण दुसऱ्या नव्या चेंडूमुळे फिरकी गोलंदाजांचं नुकसासन होणार आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेची क्रिकेट फॅन्सकडून आतुरतेने वाट पाहिली जात आहे. या स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आमनेसामने येणार आहे. हा सामना कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.