IND vs BAN,1st Test Day 4: चौथ्या दिवशी पाऊस खेळ बिघडवणार? कसं असेल हवामान? जाणून घ्या

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
IND vs BAN,1st Test Day 4: चौथ्या दिवशी पाऊस खेळ बिघडवणार? कसं असेल हवामान? जाणून घ्या
ind vs banyandex
Published On

IND vs BAN 1st Test Day 4 Weather Prediction: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ ड्रायव्हिंग सीटवर आहे. चौथ्या दिवशी बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. सामन्यातील तिसरा दिवस बॅड लाईटमुळे लवकर संपवण्यात आला. दरम्यान सामन्यातील चौथा दिवस निर्णायक असणार आहे. चौथ्या दिवशी कसं असेल हवामान? जाणून घ्या.

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही पाऊस पडला. रात्री सुरू झालेला पाऊस सकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होता. मात्र याचा सामन्यावर कुठलाही परिणाम झाला नाही. खेळ वेळेत सुरू झाला. मात्र बॅड लाईटमुळे हा खेळ ठरलेल्या वेळेच्या आधीच संपवण्यात आला.

माध्यमातील वृत्तानुसार चौथ्या दिवशीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामन्यावेळी ढगाळ वातावरण असेल. याचा फायदा भारतीय गोलंदाजांना होऊ शकतो.

IND vs BAN,1st Test Day 4: चौथ्या दिवशी पाऊस खेळ बिघडवणार? कसं असेल हवामान? जाणून घ्या
IND vs BAN 1st Test: विराट कोहलीचा जलवाच भारी! १७ धावा केल्या तरी तोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

भारतीय गोलंदाजांची होणार चांदी

चौथ्या दिवशी पाऊस पडला किंवा ढगाळ वातावरण असेल तर याचा फायदा भारतीय गोलंदाजांना होऊ शकतो. कारण भारतीय संघ ३ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणाचा फायदा भारतीय वेगवान गोलंदाजांना होऊ शकतो.

IND vs BAN,1st Test Day 4: चौथ्या दिवशी पाऊस खेळ बिघडवणार? कसं असेल हवामान? जाणून घ्या
IND vs BAN: इथे लावा एक फिल्डर...; ऋषभ पंतने सेट केली बांगलादेशाच्या टीमची फिल्डींग, Video Viral

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. भारतीय संघाने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशचा डाव १४९ धावांवर आटोपला. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव ४ गडी बाद २८७ धावांवर घोषित करण्यात आला. भारतीय संघाने बांगलादेशसमोर विजयायाठी ५१५ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करताना सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशचे ४ फलंदाज बाद होऊन माघारी परतले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com