Ind Vs Eng कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या खेळात अनपेक्षित 'खोडा'! Leeds मधून आले महत्त्वाचे अपडेट्स

Ind Vs Eng 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडिमयवर खेळला जात आहे. आज सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. इंग्लंडसमोर विजयासाठी ३५० धावांचे लक्ष आहे.
Ind Vs Eng 1st Test
Ind Vs Eng 1st Testx
Published On

Ind Vs Eng पहिल्या कसोटी सामन्याचा आज (२४ जून) शेवटचा दिवस आहे. इंग्लंडला विजय मिळवण्यासाठी ३५० धावा करणे आवश्यक आहे, तर भारताला हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंना रोखावे लागणार आहे. लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर कसोटी सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सामन्याच्या तिन्ही सत्रांमध्ये हवामान कसे असेल? त्याचा पिचवर परिणाम होईल का? आणि याचा फायदा कोणत्या संघाला होईल? चला जाणून घेऊयात...

Ind Vs Eng 1st Test
रोहित शर्मा कसोटीपाठोपाठ वन डेतूनही निवृत्त? २३ जूनचा साधला मुहूर्त; इंस्टा पोस्टने वेधले लक्ष

लीड्समध्ये आज (२१ जून) हवामान ढगाळ आहे. पाऊस पडल्याने कसोटी सामन्यावर परिणाम होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. सामन्याच्या सुरुवातीलाच पाऊस पडण्याची शक्यता २० टक्के आहे. लीड्समध्ये २४ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. याचा थेट फायदा भारतीय गोलंदाजांना होऊ शकतो. तिन्ही सत्रात तापमान १८ ते २० अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.

Ind Vs Eng 1st Test
Ind Vs Eng : मार कोलांटीउडी.. मार कोलांटीउडी.. सुनील गावस्करांनी पव्हिलियनमधून केला इशारा, रिषभ पंतने दिलं भन्नाट उत्तर; Video

दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रामध्येही पावसाची २० टक्के शक्यता आहे. या दोन्ही सत्रांमध्ये वारे २४ ते २६ किमी प्रतितास वेगाने वाहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. सामन्यादरम्यान पाऊस पडलेच असे नाही. पण ढगाळ वातावरणामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना त्रास होऊ शकतो. या परिस्थितीचा जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना फायदा होऊ शकेल. जर पाऊस पडला नाही किंवा ढगाळ वातावरणात बदल झाला, तर खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होईल आणि भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागेल.

Ind Vs Eng 1st Test
KL Rahul : केएल राहुलनं इंग्लंडच्या गोलंदाजांना दमवलं; संयमी फलंदाजी करत ठोकलं शतक, टीम इंडिया भक्कम स्थितीत

इंग्लंडसमोर ९० ओव्हर्समध्ये ३५० धावांचे लक्ष्य

प्रथम फलंदाजी करताना भारताने एकूण ४७१ धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी तोडीस तोडी खेळ करत ४६५ धावा केल्या. दुसरा डाव सुरु होण्यापूर्वी भारताकडे फक्त ६ धावांची आघाडी होती. त्यानंतर भारताचा संघ ३६४ धावांवर ऑलआउट झाला. आता सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी ९० ओव्हर्समध्ये ३५० धावा करायच्या आहेत.

Ind Vs Eng 1st Test
Rishabh Pant : सूजवलं रे याने एकाच जागी मारून-मारून ; स्टम्प माईकमध्ये रिषभ पंतचे 'ते' शब्द कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com