
Ind Vs Eng पहिल्या कसोटी सामन्याचा आज (२४ जून) शेवटचा दिवस आहे. इंग्लंडला विजय मिळवण्यासाठी ३५० धावा करणे आवश्यक आहे, तर भारताला हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंना रोखावे लागणार आहे. लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर कसोटी सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सामन्याच्या तिन्ही सत्रांमध्ये हवामान कसे असेल? त्याचा पिचवर परिणाम होईल का? आणि याचा फायदा कोणत्या संघाला होईल? चला जाणून घेऊयात...
लीड्समध्ये आज (२१ जून) हवामान ढगाळ आहे. पाऊस पडल्याने कसोटी सामन्यावर परिणाम होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. सामन्याच्या सुरुवातीलाच पाऊस पडण्याची शक्यता २० टक्के आहे. लीड्समध्ये २४ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. याचा थेट फायदा भारतीय गोलंदाजांना होऊ शकतो. तिन्ही सत्रात तापमान १८ ते २० अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.
दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रामध्येही पावसाची २० टक्के शक्यता आहे. या दोन्ही सत्रांमध्ये वारे २४ ते २६ किमी प्रतितास वेगाने वाहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. सामन्यादरम्यान पाऊस पडलेच असे नाही. पण ढगाळ वातावरणामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना त्रास होऊ शकतो. या परिस्थितीचा जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना फायदा होऊ शकेल. जर पाऊस पडला नाही किंवा ढगाळ वातावरणात बदल झाला, तर खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होईल आणि भारतीय गोलंदाजांना संघर्ष करावा लागेल.
इंग्लंडसमोर ९० ओव्हर्समध्ये ३५० धावांचे लक्ष्य
प्रथम फलंदाजी करताना भारताने एकूण ४७१ धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी तोडीस तोडी खेळ करत ४६५ धावा केल्या. दुसरा डाव सुरु होण्यापूर्वी भारताकडे फक्त ६ धावांची आघाडी होती. त्यानंतर भारताचा संघ ३६४ धावांवर ऑलआउट झाला. आता सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी ९० ओव्हर्समध्ये ३५० धावा करायच्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.