IND vs AUS Semi Final : भारताच्या हातातून सामना कसा निसटला; ही आहेत पराभवाची ५ मोठी कारणे

आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला.
IND vs AUS Semi Final Women T20 World Cup
IND vs AUS Semi Final Women T20 World CupSaam TV

IND vs AUS Semi Final Women T20 World Cup : आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या चेंडूपर्यंत झालेल्या अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर ५ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. तर भारताचं टी-२० विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. (Latest Sports News)

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला १७४ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात अत्यंत निराशाजनक झाली. शफाली वर्मा (९), उपकर्णधार स्मृती मनधाना (२) आणि यास्तिका भाटिया (४) झटपट माघारी परतल्याने भारताची ३ बाद २८ अशी स्थिती झाली होती.

IND vs AUS Semi Final Women T20 World Cup
Team India Vice Captain : रोहित शर्माचा मित्र होणार टीम इंडियाचा उपकर्णधार; केएल राहुलनंतर कुणाला मिळणार संधी?

यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या जेमिमा आणि हरमनप्रीत यांनी चौथ्या गडय़ासाठी ६९ धावांची भागीदारी रचत भारताच्या आशा कायम ठेवल्या. दोघींनी मिळून तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना घाम फोडला. आता ही जोडी भारताला विजय मिळवून देईल, असं वाटत असतानाच मोठा फटका मारण्याच्या नादात जेमिमा बाद झाली. (cricket news)

जेमिमाने आपल्या खेळीत ६ चौकार मारले. यानंतर हरमनप्रीतने रिचा घोषच्या (१४) साथीने भारताच्या धावसंख्येत भर घालणे सुरू ठेवले. दरम्यान, अर्धशतक झळकावल्यानंतर दुसरी धाव घेताना बॅट खेळपट्टीमध्ये अडकल्याने हरमनप्रीत धावबाद झाली. तेथूनच सामन्याचे चित्र पालटले. त्यानंतर भारताच्या एकामागोमाग एक विकेट पडत गेल्या आणि भारतीय संघ २० षटकांत केवळ १५७ धावाच करू शकला.

भारताची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण खराब

भारताने सेमीफायनल सामन्यात फक्त ५ गोलंदाज खेळवले आणि या सर्व गोलंदाजांनी ४ षटकात प्रत्येकी किमान ३० धावा दिल्या. यात सर्वात महागडी रेणुका सिंह ठरली. तिने शेवटच्या षटकात १८ तर एकूण ४१ धावा दिल्या. यासोबत फिल्डिंग करताना सामन्यात झेल, स्टम्पिंगच्या संधी सोडल्या आणि गचाळ क्षेत्ररक्षण करत धावाही दिल्या. (India vs Australia)

भारताची आघाडीची फलंदाजी ढेपाळली

अतिशय महत्वाच्या सामन्यात पुन्हा एकदा भारताच्या आघाडीच्या फलंदाजीला खिंडार पडले. शफाली वर्मा, स्मृती मानधना आणि यास्तिका भाटिया स्वस्तात बाद झाल्या. तिघींनी मिळून फक्त १५ धावा केल्या. या तिघी बाद झाल्यानंतर जेमिमाह आणि हरमनप्रीत यांनी डाव सावरला पण पुन्हा भारताला पुनरागमन करता आलं नाही.

IND vs AUS Semi Final Women T20 World Cup
IND vs AUS ODI : भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात मोठे बदल; ३ तगड्या खेळाडूंची वापसी

हरमनप्रीत धावबाद अन् सामन्याचं चित्रचं पालटलं.

भारत (Team India) सेमीफायनल सहज जिंकणार असं वाटत असतानाच १५ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हरमनप्रीत धावबाद झाली. क्रीजमध्ये सहज पोहचेल असं वाटणाऱ्या हरमनप्रीतची बॅट जमीनीत रुतल्यानं वेळेत क्रीजमध्ये पोहोचू शकली नाही. त्यामुळे ५२ धावांवर हरमनप्रीत बाद झाली आणि भारताच्या सेमीफायनल जिंकण्याच्या आशा मावळल्या.  (Latest Marathi News)

ऋचा घोषची विकेट टर्निंग पॉईंट

भारताच्या डावातील हरमनप्रीतनंतर ऋचा घोषची विकेट मोठा टर्निंग पॉइंट ठरली. हरमनप्रीत बाद झाल्यानंतर जोपर्यंत ऋचा घोष मैदानात होती तोपर्यंत भारत जिंकेल असं वाटत होतं. पण १६ व्या षटकात अखेरच्या चेंडूवर डार्सी ब्राउनने तिला बाद केलं. उंच फटका मारण्याच्या नादात ती झेलबाद झाली. सीमारेषेवर ताहिला मॅक्ग्राने तिचा झेल घेतला.

१९ वे षटक भारताच्या पराभवाचे खरे कारण

ऑस्ट्रेलियाच्या संघाला अखेरच्या दोन षटकात १९ धावा वाचवायच्या होत्या तर भारताला विजयासाठी २० धावा हव्या होत्या. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने जेस जोनासनकडे चेंडू सोपवले. तिने या षटकात फक्त ४ धावा देल्या आणि अखेरच्या चेंडूवर स्नेह राणाची विकेट घेतली. यानंतर अखेरच्या षटकात एश गार्डनरने तिचं काम चोखपणे पार पाडलं.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com