
सुप्रीम मस्कर, साम टीव्ही
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर पाकला तोडीसतोड उत्तर द्या, अशी मागणी देशवासियांकडून होत आहे. त्यातच भारतानं पाकविरोधात कठोर पाऊलं उचलायला सुरुवात केलीय. पाणी, जमीन आणि आकाशातही पाकची कोंडी करून शेवटचा प्रहार करण्यासाठी भारत सज्ज आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही याबाबत भाष्य केलयं.
पाकच्या नाकीनऊ आणत भारतानं क्षेपणास्त्र चाचण्या, अरबी समुद्रातील युद्ध सराव आणि युद्धनौकांच्या माध्यमातून पाकची झोप उडवलीय. त्यात भारतीय हवाई दलाने रशियाकडून 250 कोटींचा विशेष करार करून प्रगत इग्ला-एस हवाई संरक्षण क्षेपणास्त्र मिळवण्याची तयारी सुरु केलीये. शत्रूची लढाऊ विमाने, ड्रोन आणि हल्ला करणारे हेलिकॉप्टर पाडण्यासाठी हे क्षेपणास्त्र महत्त्वाची भूमिका बजावणारे. त्यामुळे भारतात आता पाकविरोधातील कारवाईच्या तयारीनं चांगलाच जोर धरलाय.
बैठकांचा सिलसिला, पाकवर हल्ला?
26 एप्रिल 2025
पंतप्रधानांची पहिल्यांदा सीसीएस बैठक
30 एप्रिल 2025
लष्करप्रमुखांची पंतप्रधानांसोबत बैठक
1 मे 2025
भारतीय सैन्याला पंतप्रधानांचा सर्वाधिकार
3 मे 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदींची नौदलासोबत बैठक
4 मे 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदींची वायुदलासोबत बैठक
5 मे 2025
भारत- जपान द्विपक्षीय बैठक
सर्व बैठकीत भारत- पाकिस्तान तणावावर चर्चा
पाकविरोधातील युद्धाच्या रणनितीची आखणी
भारताकडून होणाऱ्या कारवाईच्या भीतीनं आता चक्क तिथले खासदार भारताबरोबर युद्ध झाल्यास इंग्लडला पळून जाण्याच्या भाषा बोलू लागलेत. तरीही पाक नेत्यांकडून धमक्या दिल्या जात आहे. त्यामुळे 'कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडचं' अशी पाकची अवस्था आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.