Pulwama Attack: 14 फेब्रुवारीचा तो काळा दिवस...; पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला कसा झाला? वाचा

Black Day: आज पुलवामा दहशतवादी हल्ल्याला सहा वर्षे पूर्ण झाली. 14 फेब्रुवारी 2019 चा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वांत दुर्दैवी दिवसांपैकी एक मानला जातो, ज्यात 40 सीआरपीएफ जवानांनी आपले प्राण गमावले होते.
Pulwama Attack
Pulwama AttackYandex
Published On

आज पुलवामा दहशतवादी हल्ल्याला 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. 14 फेब्रुवारी 2019 हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात दुर्दैवी घटनांपैकी एक मानला जातो. या दिवशी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवानांनी आपले प्राण गमावले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर हा हल्ला झाला होता.

अवंतीपोरा येथील गोरीपोरा परिसरात ताफ्यासोबत जाणाऱ्या एका संशयास्पद वाहनाने एका बसला जोरदार धडक दिली आणि तात्काळ स्फोट घडवून आणला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या वीर शहिदांच्या बलिदानाने देशवासीयांना सुरक्षा आणि एकतेच्या दिशेने अधिक जागरूक केले आहे. आजचा दिवस त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्याचा आहे.

Pulwama Attack
धावत्या ट्रेनमधून गायब झाला, तब्बल १३ दिवसांनी भंडाऱ्यातील 'तो' जवान मध्यप्रदेशात सापडला; नेमका होता कुठे?

अवंतीपोरा येथील गोरीपोरा परिसरात श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दहशतवाद्यांनी सीआरपीएफ ताफ्यावर भयंकर हल्ला केला. ६० हून अधिक लष्करी वाहनांमध्ये २५४७ सैनिक प्रवास करत होते. एका स्फोटकांनी भरलेल्या कारने लष्करी बसेसना धडक दिली, ज्यामुळे जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू आला, आणि परिसर आग व धुराने व्यापला. या भयानक हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले, ज्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले.

Pulwama Attack
Google Chrome: गुगल क्रोम वापरताय तर ही बातमी तुमच्यासाठी! सरकारने दिला अलर्ट, वाचा

जैश-ए-मोहम्मद

अवंतीपोरा येथे झालेल्या भयंकर हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली होती. या स्फोटाने अनेक लष्करी बसेसचा नाश केला आणि ४० जवान शहीद झाले. स्फोटाच्या तीव्रतेने संपूर्ण देश हादरला, भारतीयांच्या मनाला मोठा धक्का बसला. या क्रूर कृत्याने देशभर शोककळा पसरली, आणि लोकांच्या नजरा आता दहशतवादाविरोधातील कठोर कारवाईकडे लागल्या होत्या.

Pulwama Attack
Crime News: मोमोज खायला निघाल्या, वाटेत दोघांनी मायलेकांना छेडलं; नागरिकांकडून तरुणांची धुलाई

सर्जिकल स्ट्राईक

पुलवामा हल्ल्यानंतर फक्त १२ दिवसांनी, २५ फेब्रुवारीच्या रात्री भारताने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केली. या कारवाईत भारतीय हवाई दलाने २ हजार विमानांच्या मदतीने सुमारे १ हजार किलो बॉम्ब टाकले आणि ३०० पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवादी छावण्यांवर झालेल्या या हल्ल्याने पाकिस्तानला अचंबित केले. या प्रभावी कारवाईला बालाकोट एअर स्ट्राईक असे नाव देण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com