
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर लक्षभेदी हल्ले करत दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचं कंबरडं मोडलं.. त्यामुळे हैराण झालेल्या पाकिस्ताननं थेट अमेरिकेच्या मदतीनं शस्त्रसंधी केली आणि भारतासोबत चर्चेला तयार असल्याचं स्पष्ट केलं... मात्र पंतप्रधान मोदींनी चर्चा फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच होईल, अशा स्पष्ट शब्दात पाकिस्तानला ठणकावलंय..
अमेरिकेच्या मदतीनं भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली... त्यानंतर अमेरिकेनं व्यापारी निर्बंध लादण्याच्या धमकीमुळे शस्त्रसंधी झाल्याचं म्हटलंय... एवढंच नाही तर काश्मीरबाबत मध्यस्थी करण्याची तयारीही दर्शवलीय...मात्र नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांची मध्यस्थीवरची ऑफर धुडकावून लावली.. यावेळी मोदींनी कोणते मुद्दे मांडले? पाहूयात...
- पाकिस्तानसोबत दहशतवाद आणि पीओकेवरच चर्चा
- दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही
- पाणी आणि रक्त सोबत वाहू शकत नाही म्हणत सिंधू जलवाटप करारावर स्पष्ट भूमिका
- ऑपरेश सिंदूर केवळ स्थगित
- काश्मीरच्या मुद्द्यावर द्विपक्षीयच चर्चा होणार
अमेरिकेच्या दाव्याप्रमाणे डीजीएमओमध्ये होणारी चर्चा त्रयस्थ देशात होणार होती... मात्र भारतानं अमेरिकेच्या दबावापुढं न झुकता पाकसोबतच्या चर्चेसाठी हॉटलाईनचा मार्ग स्वीकारलाय..त्यामुळं पाकिस्तानसोबतच्या चर्चेतून काश्मीरचा मुद्दा सुटणार की पुन्हा पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार? हे पाहावं लागेल... मात्र पाकिस्ताननं पुन्हा कुरापत काढल्यास पुन्हा भारताच्या वाटेला जाण्याचं नावही काढलं जाणार नाही, असं उत्तर द्यावं लागेल...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.