अक्षय बडवे, साम टीव्ही
पावसासाठीचे पोषक वातावरण तयार झालं नसल्याने पुढील ६ ते ७ दिवस मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहील आणि पावसाची कुठला ही अलर्ट नसल्याची माहिती पुणे वेधशाळेने आज दिलीय. गेल्या आठवड्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानंतर गेल्या २ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील ७ दिवस राज्यात काही जिल्ह्यांमध्ये तुरळक असा हलक्या सरींचा पाऊस पडेल अशी शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यातील पुढील ७ दिवसांमध्ये वातावरण आणि पावसाचा प्रवास कसा असणार आहे.
महिन्याच्या सुरुवातील मुंबईसह, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, रायगड, पालघर परिसराला तूफान पावसाने झोडपून काढले. मात्र मागच्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबई आणि परिसरातील वातावरणात आर्द्रता वाढली आहे. पुढच्या आठवड्यात पारा 33 अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.
कोकण विभागात देखील सूर्य आग ओकत असून डहाणू आणि अलिबाग या दोन्ही केंद्रांवर 33.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालीय. अलिबाग केंद्रावर नेहमीपेक्षा 3.3 अंशांनी, तर डहाणू केंद्रावर 2.7 अंशांनी कमाल तापमानात वाढ झाल्याची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात सोलापूर येथे 35.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची शुक्रवारी नोंद झाली. तर विदर्भामध्ये राज्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर येथे पारा 36 अंशांच्या पार पोहोचला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.