अमर घटारे
अमरावती : सोयाबीनसाठी शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावानुसार नाफेडच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना दर मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवली असून खासगी बाजारात जाऊन सोयाबीन विक्री करत आहेत.
शासन दराने सोयाबीनची खरेदी करण्याकरिता नाफेड अंतर्गत (Amravati) अमरावती जिल्ह्यात २० केंद्र सुरू करण्यात आली. यासाठी दहा हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्या तुलनेत १८ केंद्रामध्ये फक्त ४२४ शेतकऱ्यांच्या १५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. (Soyabean Price) सोयाबीनमधील आद्रता व निकष या अटीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे सरकारच्या नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांनी जाणे टाळले आहे.
हमीभावापेक्षा मिळतोय कमी दर
दरम्यान शासनाने यावर्षी ४ हजार ८९२ प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला नाही. परिणामी खाजगी बाजारात शेतकऱ्यांना सोयाबीन साडेतीन हजार ते चार हजार रुपयात सोयाबीन विकावे लागत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.