Devendra Fadnavis : सरकार स्थापन होण्याआधीच देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये

Devendra Fadnavis News : सरकार स्थापन होण्याआधीच देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी वक्फ बोर्डाच्या निधीबाबतचा निर्णय मागे घेतल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis x platform
Published On

मुंबई : राज्यात महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाने वक्फ बोर्डासाठी निधी जाहीर केला होता. या निर्णयाविरोधात भाजपने प्रचारादरम्यान वक्फ बोर्डाने चिंता व्यक्त केली होती. आता निवडणुकीनंतर महायुतीने मॅजिक फिगर गाठल्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी वक्फ बोर्डाच्या निधीसंदर्भात निर्णय शासन पातळीवर मागे घेण्याची माहिती दिली.

महायुती सरकारने वक्फ बोर्डाच्या कामकाजासाठी फंड मंजूर केला होता. महाराष्ट्र सरकारने आर्थिक वर्ष २४-२५ मध्ये अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी वक्फ बोर्डासाठी १० कोटींची घोषणा केली होती. निवडणुकीआधी अल्पसंख्याक कल्याण विभागाने छत्रपती संभाजीनगरमध्ये २ कोटी रुपये दिली होते. त्यानंतर उरलेली रक्कम निवडणुकीनंतर देण्याचं आश्वासन दिलं होतं.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis: महाराष्ट्रातही भाजपचं धक्कातंत्र? पुन्हा फडणवीस येणार की दुसरं कुणी?

या मदतीला विश्व हिंदू परिषदेने विरोध केला होता. विश्व हिंदू परिषदेच्या कोकण विभागाचे मोहन साळेकर यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध केला होता. या विरोधानंतर भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत सांगितलं की, 'महाराष्ट्रात काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्याबाबत निर्णय घेतला होता. या निधीसंदर्भात प्रशासनाने जीआर काढण्याचा प्रकार योग्य नाही. त्यामुळे मुख्य सचिवांनी तत्काळ तो आदेश मागे घेतला आहे. महाराष्ट्रात नवीन सरकार येताच याचे औचित्य आणि नियमाधीनतेची चौकशी केली जाईल'.

Devendra Fadnavis
Eknath Shinde PC: नाराज होऊन रडणारे नाही.. लढणारे! एकनाथ शिंदेंनी काय काय सांगितलं?

विश्व हिंदू परिषदेने केला होता विरोध

वक्फ बोर्डाला निधी जाहीर केलेल्या निर्णयाविरोधात विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याने म्हटलं होतं की, 'महायुती सरकारने जे केलं की, ते काँग्रेस सरकारने केलं होतं. सरकार धार्मिक समुदायाचं चांगुलपण करत आहे. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही, तर विधानसभा निवडणुकीत आमच्या रागाचा सामना करावा लागेल'.

महाराष्ट्र भाजपनेही या निर्णयानंतर 'एक्स'वर पोस्ट लिहिली आहे. 'महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी निधी दिल्याच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. हा चुकीचा निर्णय प्रशासकीय पातळीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी परस्पर घेतला होता. त्यानंतर भाजप नेत्यांच्या विरोधानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला आहे, असे भाजपने म्हटलं आहे.

Devendra Fadnavis
Maharashtra politics : कोण कोणती मंत्रिपदे? शिंदेंनी अमित शाहांना मनातलं सगळं सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com