Ramdas Athawale: शपथविधी कार्यक्रमाला मविआच्या नेत्यांची अनुपस्थिती; केंद्रिय मंत्री म्हणाले, त्यांच्या मनात राग पण..

Union Minister Ramdas Athawale on Mahayuti Sarkar: ईव्हीएमवर राजकारण ते बॅलेटपेपरवर निवडणूक घेण्याची तयारी; केंद्रिय मंत्री स्पष्टच बोलले. आम्ही बॅलेट पेपरवर निवडणुक लढण्यास तयार आहोत पण..
Mahayuti Sarkar
Ramdas Athawale on MahayutiSaam Tv News
Published On

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा दिग्गज मंडळींच्या उपस्थित झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, यासह केंद्रातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली. मात्र या शपधविधी सोहळ्याला महाविकास आघाडीतील नेत्यांची अनुपस्थिती होती. शपथविधी सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह इतर विरोधीपक्षांना निमंत्रण दिलं होतं. मात्र विरोधी पक्षाकडून कुणीही उपस्थित नव्हतं. 'त्यांच्या मनात राग आहे. पण आमच्या मनात विकासाची आग आहे. आघाडीतील नेत्यांनी उपस्थित राहायलं हवं होतं'. असं म्हणत केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकेची तोफ डागली.

बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त आठवले म्हणाले..

'बाबासाहेबांचा मोठा गर्व आणि अभिमान आम्हाला आहे. ज्या रिपब्लिकन पक्षासाठी बाबासाहेब झटले, तो पक्ष पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. बाबासाहेबांना राजकारणात आणू नका. ते देशातील १४० कोटी जनतेचे आहेत. बाबासाहेबांचं नाव घेतलं की आम्हाला प्रेरणा मिळते. त्यांनी विश्वशांतीसाठी बौद्ध धर्माची दिक्षा घेतली.' असं रामदास आठवले म्हणाले.

महाविकास आघाडीवर टीका

'निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. संविधान बदलाचा प्रचार यंदा चालला नाही. महाराष्ट्राचा विकास हाच आमचा ध्यास. यासाठी महायुतीचे सरकार प्रत्येकासाठी काम करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यासाठी प्रयत्नशील असतील.' असं रामदास आठवले म्हणाले.

Mahayuti Sarkar
Ramdas Athawale: 'आंबेडकरांनी आरपीआयचं नेतृत्व करावं', रामदास आठवलेंची आंबेडकरांना ऑफर

ईव्हीएम मशीवर राजकारण

'५ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा दिमाखात पार पडला. मात्र महाविकास आघाडीची अनुपस्थिती होते. त्यांच्या मनात राग आहे. पण आमच्या मनात विकासाची आग आहे. आघाडीतील नेत्यांनी उपस्थित राहायलं हवं होतं.' असं म्हणत त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. शपथविधी सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह इतर विरोधीपक्षांना निमंत्रण दिलं होतं. मात्र विरोधी पक्षाकडून कुणीही उपस्थित नव्हतं.

पुढे ते म्हणतात, 'ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून राजकारण सुरू आहे. निवडणुकीत आम्ही संविधान आणि इव्हीएम मशीनला मध्ये आणलं नाही. आम्ही बॅलेट पेपरवर निवडणुक लढण्यास तयार आहोत. निर्णय निवडणूक आयोगाला घ्यायचा आहे. पण त्याचा काही फायदा होणार नाही.' असं म्हणत त्यांनी ईव्हीएमवर राजकारण करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं.

Mahayuti Sarkar
Ramdas Athawale : राज ठाकरेंच्या सभांना केवळ गर्दी, मतांचा दुष्काळ; लोकसभेचा दाखला देत रामदास आठवलेंनी लगावला टोला

बटेंगे तो कटेंगे

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्याथ यांनी बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक है तो सेफ है हा नारा दिला. हे दोन्ही नारे विधानसभा निवडणुकीत तुफान गाजले. 'सर्व धर्मांनी एकत्र राहिली पाहिजे. समाजात फूट पडू नये, सगळ्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं यासाठी नारा देण्यात आला होता. समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी हा नारा नव्हता.' या दोन्ही नाऱ्यांवर रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com