Ramdas Athawale: 'आंबेडकरांनी आरपीआयचं नेतृत्व करावं', रामदास आठवलेंची आंबेडकरांना ऑफर

Vanchit Bahujan Aaghadi : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आरपीआय नेते रामदास आठवले यांनी साताऱ्यात मोठं विधान केलंय. प्रकाश आंबेडकरांना त्यांनी एकत्र येण्याची साद दिली आहे. यावर वंचित बहुजन आघाडीची काय भूमिका आहे? पाहूया एक रिपोर्ट..

दलितांना संघटित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरपीआयची स्थापना केली. मात्र गेल्या काही दशकांत या पक्षाची अनेक शकलं झाली. आणि आंबेडकरी चळवळ दुभगंली. मात्र आता या चळवळीच्या एकजुटीसाठी केंद्रीय मंत्री आणि रिपाइं आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पुढाकार घेतलाय. त्यांनी यासाठी थेट वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकरांनाच नेतृत्व करण्याची ऑफर दिलीय. मात्र ही ऑफर वंचित बहुजन आघाडीनं धुडकावून लावलीय.

रामदास आठवलेंनी यापूर्वीही प्रकाश आंबेडकांना एकत्र येण्याची साद घातली आहे. मात्र आंबेडकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. आता वंचितने विधानसभा निवडणुकीसाठी आपले काही उमेदवारही जाहीर केले आहेत. राजकारणात काहीही घडू शकतं. भविष्यात आठवले आणि आंबेडकर एकत्र आले तर राज्यातील राजकारणाला नवी दिशा मिळू शकते. एव्हढं मात्र नक्की...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com