
जालना जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन सुदृश्य वस्तू दिसल्या आहेत. जालना जिल्ह्यातील मंठा, घनसावंगी ,परतुर आणि जालना तालुक्यातील अनेक गावांमध्ये ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्याने नागरिकांमध्ये सध्या भीतीच वातावरण पाहायला मिळत आहे.
एकीकडे भारत पाकिस्तान मध्ये युद्ध सुरुय त्याच अनुषंगाने अनेक ठिकाणी मॉक ड्रिल घेतले जात आहे याच दरम्यान परभणीच्या सेलू आणि गंगाखेड तालुक्यातून आकाशात एकाच लाईन मध्ये अनेक ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्या आहेत ग्रामीण भागात यामुळे कुतूहलला विषय झालाय या काही भागात भीतीचे वातावरण ही पसरले आहे
पावसाळ्यात येणाऱ्या पूर परीस्थितीसह उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे का याची चाचपणी करण्यासाठी आज बाजारपेठ पोलीस, महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलीसाबरोबरच पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांनी कल्याण खाडीत मॉकड्रील केले या मॉकड्रील मध्ये पोलीस कर्मचार्या बरोबरच अग्निशमनचे जवानानी सहभाग घेतला होता.
युद्धजन्य परिस्थिती सध्या भारतावर असताना एखाद्या व्यक्तीत नदी किंवा तलावात अडकल्यास पाण्यात पडलेल्या व्यक्तीला बुडत असल्यास त्या व्यक्तीला कसं वाचवता येईल..
पाण्यातून बाहेर काढल्यावर कशा पद्धतीने त्याला प्रथमोपचार केला पाहिजे. या सगळ्या संदर्भातली माहिती NDRF फोर्स कडून आज नागपूरतील फुटाळा तलावात मॉकड्रिलच्या माध्यमातून देण्यात आली...
अचानक सायरन वाजल्याने पालिका आणि शिवाजी चौक परिसरातील नागरिकांची पळापळ
सुरक्षारक्षकांना विचारले असता, दररोज चार वाजता सायरन टेस्टिंग केलं जात असल्याची दिली माहिती
राज्यातील आय पी एस अधिकाऱ्यांची बदली.
राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशात आज ६ अधिकाऱ्यांच्या बदल्या.
राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागात (सी आय डी) सुनील रामानंद यांची अपर पोलीस महासंचालक म्हणून बदली.
प्रशांत बुरडे यांची पोलिस महासंचालक, लोहमार्गमध्ये बदली.
राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या.
वाशिमच्या जऊळका रेल्वे या गावचे सुपुत्र, कृष्णा राजू अंभोरे यांनी आपल्या देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचं एक अनोखं उदाहरण दिलंय,लग्नाच्या केवळ चार दिवसांनंतर सैन्यदलाकडून कर्तव्यार येण्याची हाक येताच देशसेवेसाठी ते तात्काळ रवाना झाले.
नवविवाहित पत्नीला सोडून जातांना कृष्णा अंभोरे यांचं मनं गहिवरलं होतं पण कृष्णाच्या डोळ्यांत केवळ राष्ट्रसेवेचं समर्पण होतं.भावनांच्या काठावर उभं राहून, ते तात्काळ कर्तव्यावर रवाना झाले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात आज दुपारी अचानक सायरन वाजल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. कुठलीही पूर्वसूचना न देता वाजवलेल्या या सायरनमुळे परिसर काही वेळासाठी नागरिकांची मात्र चांगलीच धावपळ झाली .काही क्षणातच सायरन टेस्टिंग साठी वाजवण्यात आल्याचं समजलं. मात्र अशा प्रकारे अनपेक्षित सायरन वाजवणं चुकीचं असल्याचं म्हणत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
परभणीच्या जलतरणीकेत बुडून एका ५५ वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज परभणीत घडलीय.शहरातील मोहमदिया मशीद परिसरात राहणारे असलम खान हे आज रोजच्या प्रमाणे आपल्या मित्रांसमवेत जलतरणीकेत पोहण्यासाठी आले होते मात्र काही वेळाने ते दिसेनासे झाले त्यामुळे मित्रांनी त्यांना शोधायला सुरुवात केली तब्बल ३ तास जलतरणीकेतील कर्मचाऱ्यांनी शोधल्यानंतर त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला दरम्यान महानगरपालिकेने जलतरणीका ही खाजगी तत्वावर चालवण्यास दिली आहे काही वर्षांपूर्वी असाच एक तरुणांचा मृत्यू झाला होत त्यानंतर आज ही तशीच घटना घडलीय त्यामुळे इथे लक्ष देण्याची मागणी केली जातेय.
पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या बीड शहरवासीयांनी नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली. मुख्यधिकारी नीता अंधारे यांनी पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिले. बीड शहरात गेल्या महिनाभरापासून पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने बोअर ची पाणी पातळी देखील खाली गेल्याने शहरातील नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधले जावे याकरिता हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
देशात युद्ध जन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्र किनारपट्टीवर सध्या कस्टम विभागाकडून गस्त घातली जात आहे. यामध्ये अतिसंवेदनशील असणाऱ्या शेखाडी बंदरावरती कस्टमकडून खास लक्ष केंद्रित केले जात आहे. सध्या जरी काही संशयास्पद हालचाली नसल्या तरीही सतर्क राहण्याच्या सुचना वरिष्ठ पातळीवरून असल्याने योग्य खबरदारी घेतली जात असल्याची माहिती कस्टम अधिक्षक यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासून शहरात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र दुपारी तीन वाजता दरम्यान अचानक मुसळधार पाऊस आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. आज सलग दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार अवकाळी पाऊस पडत आहे. . मात्र पहिल्याच दिवशी शहरात साचलेल्या पाण्यामुळे महापालिकेच्या कामांची पोलखोल झालीं आहे. संपूर्ण शहरात पाणीच पाणी साचले असून पावसाळ्यात असाच मोठा पाऊस झाला तर संपूर्ण शहर तुंबण्याची भीती आता नागरिकांना पडली आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून कल्याण स्टेशन परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू असून या कामात रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळच्या जागेची मागणी केली होती.
मात्र या जागेत डॉ आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्याचे प्रस्तावित असल्याने या जागेस पुतळ्याच्या मागील बाजूची काही जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी आज पुन्हा एकदा पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली.
दरम्यान आयुक्त गोयल यांनी सदरचे प्रकरण आरबीट्रेटरकडे सुरू असून सहा जून रोजी त्याची पुढील सुनावणी आहे. आरबीट्रेटरच्या निकालानंतर ही जागा स्मारकासाठी उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन दिल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आणि मुंबईच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. मुंबईतील विमानतळावर ड्रोन आढळल्यानंतर त्यांनी तातडीने सुरक्षेचा आढावा घेतला.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आश्चर्य वाटू देऊ नका असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. या वक्तव्यावर आता विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार साहेब हे आमचे दैवत आहेत. शरद पवारांनी स्थापित केलेल्या फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावरच अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष चालवतात. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आला तर आनंदच होईल. अशी प्रतिक्रिया अण्णा बनसोडे यांनी आज पिंपरी चिंचवड शहरात माध्यमांशी बोलताना दिली आहे.
पुणे शहरातील उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात. कात्रज आणि कोंढवा परिसरात तासापासून मुसळधार पाउस आणि सोसाट्याचे वारे वाहत आहेत.
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील सावरगाव माळी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तळ्यातील पाणी ग्रामपंचायतने विकल्याने पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. संतप्त गावकऱ्यांनी गेल्या चार दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावले आहे. जोपर्यंत पाण्याच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्याचे कुलूप काढणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. महिल,पुरुषांनी गेल्या चार दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
पळशी सुपो येथून शेगावकडे येणाऱ्या मोटरसायकलला भेंडवळ जवळील माऊली फाटा येथे भरधाव जाणाऱ्या टिप्परने जोरदार धडक दिली
यामध्ये मोटरसायकल वरील दोन बालके जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
आपल्या आजी आजोबा सोबत दोन्ही नातवंड हे शेगावकडे येत होते.
अपघातानंतर संतप्त जमावाने टिप्परला आगीचे हवाली केले.
आयपीएल अनिश्चित काळासाठी आजपासून स्थगित करण्यात आला आहे.
भारत-पाकिस्तानच्या संघर्षामुळे बीसीसीआयचा मोठा निर्णय
आयपीएलचे आणखी १६ सामने शिल्लक आहेत.
अजितदादा यांना हेलिकॉप्टर उड्डाण करण्यास परवानगी नाकारली
सिक्युरिटी च्या कारणास्तव परवानगी नाकारल्याची प्राथमिक माहिती...
साताऱ्यातून मुंबईला अजितदादा बाय रोड येणार आहेत
नवी मुंबई वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या ठाणे ते वाशी, पनवेल, नेरूळ ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुक ठप्प झाली होती.
ऐरोली पुलाचे गर्डर तिरके झाल्याने हा परिणाम झाला होता.
ठाणे ते वाशी अणि पनवेल या ठिकाणची सेवा सुरू झाली आहे.
वेबसाईटवर झळकले हॅक झाल्याचे संदेश
हॅक नसून व्हायरस असल्याचा मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांचा दावा
बदलापूर नगरपालिकेची वेबसाईट तूर्तास बंद
मावळ तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष यांनी पक्षाचा हाच सोडला असून शिवसेना पक्षाचा भगवा खांद्यावर घेतला आहे.
मावळ तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश वाघोले यांनी शिवसेना पक्षात जाहीर रित्या पक्ष प्रवेश केला आहे.
शिवसेना पक्षाचे प्रमुख अनिवराज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबई येथे पक्षप्रवेश केला आहे.
दरम्यान या सोहळ्याला खासदार श्रीरंग बारणे शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाचे एक धडाडीचे नेतृत्व म्हणून राजेश वाघोले यांच्याकडे पाहिले जायचे, काँग्रेसच्या युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष पद मिळाल्यानंतर पक्षात युवकांचे संघटन उभे करण्यासाठी त्यांनी चांगले काम केले होते.
तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही चांगले काम केले होते. त्यांनी पक्षाची साथ सोडल्याने मावळात काँग्रेस चे मोठे नुकसान झाले आहे....
टाटा हॉस्पिटलबाहेरील बंदोबस्त वाढवला
पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु
आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता तयारीला लागेल्याचे दिसून येत आहेत.
नांदेडमध्ये शिवसेनेने देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात बैठकांचे सत्र सुरू केले आहे.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली.या बैठकीला नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंढारकर हे उपस्थित होते.
येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढण्याची आमची इच्छा आहे.
परंतु महायुतीतील काही घटक पक्ष जर सोबळाचा नारा देत असतील तर आम्ही देखील आमची ताकद या जिल्ह्यात दाखवू आणि स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याची भूमिका शिवसेनेचे आमदार आनंद बोंढारकर यांनी व्यक्त केली.
मावळ शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरूच असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थित अनेक नाने मावळ मधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई मध्ये प्रवेश केला. मदन शेळगी तालुका संघटक उप तालुका उपप्रमुख सोमनाथ कुंडे यांच्यासह कामशेत शहर येथील उभाठा गटाचे उपशहर प्रमुख सुरेश लाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला आह. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेना सैर बैल झाल्याचे चित्र सध्या मावळात आहे. मावळचे खासदार श्रींग बारणे ही तिसऱ्या वेळा खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी शिंदे गटात आणण्यासाठी सपाटच सुरू केला आहे.
मुंबई विमानतळावरुन पोलिसांना माहिती
मशिदीवर ड्रोन घिरट्या घालत असल्याची माहिती
पोलिसांकडून तपास सुरु
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर जाण्यास मनाई
सोमवारी आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे पूर्णा तालुक्यातील कमलापूरमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे.
गावातील खांब कोसळल्याने अर्ध्या गावाला मागील 4 दिवसा पासून अंधारात राहावे लागत आहे.
परिणामी, बोअरवेल बंद असल्याने मुबलक पाणी असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
उन्हाळ्यामुळे त्रस्त नागरिकांना वीज नसल्याने अधिक त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुले आणि वृद्ध बेहाल झाले आहेत.
ग्रामस्थांनी तात्काळ नवीन खांब बसवून वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.
साऊथ ब्लॉकमध्ये तिन्ही सैन्यदलासोबत बैठक
बैठकीत सुरक्षेचा आढावा घेतला जाणार
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह बैठकीसाठी पोहोचले
तिलारी धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार- पालकमंत्री नितेश राणे
नव्याने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची आज पालकमंत्री नितेश राणे व खासदार नारायण राणे करणार पाहणी
नाधवडे येथे एसटीला डंपरची धडक दोन प्रवासी किरकोळ जखमी
मसुरे येथे कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत आज होणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन
दोडामार्ग तळकट गावात हत्तीचा धुमाकुळ. नारळ, केळी, सुपारी च्या बागांचे नुकसान
भारत पाकिस्तान युद्धाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.
कोकण किनारपट्टीसह शहरामध्ये पोलिसांकडून गस्त वाढवण्यात अली आहे.
समुद्रातून येणाऱ्या बोटींची तपासणी तसेच अनोळखी व्यक्तींची तपासणी पोलिसांकडून रात्रभर करण्यात आली.
हॉटेल, लॉजिंगची तपासणी देखील करण्यात आली.
मालवणमध्ये रात्री अचानक नाकाबंदी करण्यात आली होती. तर समुद्रकिनाऱ्यालगत 92 लँडिंग पॉइंट या ठिकाणी सागरी सुरक्षा दल यांच्यावतीने देखील रात्री ग्रस्त पाहायला मिळाली.
संशयित हालचाली किंवा संशयित व्यक्ती
आढळल्यास 112 नंबर किंवा सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे
पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने यशस्वी ऑपरेशन सिन्दुर राबवून घेतला आहे. काल रात्री पाकिस्तानच्या कुरापतीला भारताने जशास तसे उत्तर दिल्यानंतर आज संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे नाथ मंदिर परिसरात महिलांनी एकमेकींना पेढे भरवत जल्लोष केला आहे . शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पैठण शहरात जल्लोष करण्यात आला आहे.पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिल्यानंतर भारतीय सैन्याच्या कामगिरीवर जल्लोष करण्यात आला आहे.
नवी मुंबई वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या ठाणे ते वाशी, पनवेल, नेरूळ ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुक ठप्प झाली आहे.
ऐरोली पुलाचे गर्डर तिरके झाल्याने हा परिणाम झाला आहे.
ट्रान्स हार्बर मार्गिकेवर रेल्वेगाड्या उपलब्ध नसल्याने सकाळी ठाणे, दिघा, ऐरोली रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली आहे.
नोकरदारांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
अनेकांनी घरचा रस्ता धरला. तर काही प्रवासी ठाण्याहून रस्ते मार्गे नवी मुंबईच्या दिशेने निघाले होते.
भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात धार्मिकस्थळांभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पुण्यात कायम गर्दी असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर qrt, कमांडो, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
- पाकिस्तानला सद्बुद्धी सुचू दे असं साकडं दगडूशेठ बाप्पाला घातलं
- ही परिस्थिती लवकरच शांत होऊ दे
- मोदींच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे
- कोणी काळजी करण्याचे कारण नाही आपल्या सुरक्षेसाठी मोदीजी सक्षम आहेत
वाघोली पोलिस स्टेशनला राखी सावंतच्या भारतविरोधी वक्तव्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्यात आले.
शिवसेनेचे ओंकार तुपे पाटील यांनी जाहीर केलं – "राखी सावंतला कानशिलात लगावणाऱ्या देशभक्त महिलेला 1 लाख रुपयांचे बक्षीस!"
देशविरोधी वक्तव्य सहन केले जाणार नाही!
सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या एका व्यक्ती विरोधात पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या बद्दल चुकीची माहिती आणि आक्षेपार्ह भाषा वापरून त्यांची मानहानी केल्याचं तक्रारीत नमूद
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथक कार्यरत करण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या इशारा नंतर सलग दुसऱ्या दिवशी पहाटेपासून रत्नागिरीत अवकाळी पावसाला सुरुवात झाली.
समुद्रातील वातावरणीय बदलामुळे रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याचा हाय अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे.
सागरी किनारपट्टी भागातही अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग केली. पहाटेपासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला आहे..
वाशिममध्ये उन्हाचा कडाका वाढल्याने पाण्याच्या शोधात वन्यप्राणी शेतशिवार, लोकवस्तीकडे धाव घेत आहेत.
यातून काही वन्यप्राण्यांचा जीव गेला असताना दगावलेल्या वन्यजीवांची विल्हेवाट लावण्यात वनविभागाकडून प्रचंड दिरंगाई झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय,
वाशिमच्या मालेगांव वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या किन्हिराजा वन वर्तुळातील सोनाळा परिसरात फास गळ्यात अडकून दोन नीलगाई दगावल्या होत्या.
या नीलगाईची रितसर विल्हेवाट न लावल्याने या नीलगाई जागेवरच कुजल्या.
धाराशिव शहरालगतच्या सर्व्हिस रोड व नालीचे काम निकृष्ट केले असुन गुणवत्ता न राखल्यास आंदोलनाचा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आलाय.
ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेवुन याबाबत निवेदन दिलंय.
शहरातुन जाणाऱ्या धुळे - सोलापूर महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडच्या दोन्ही बाजुने केलेल्या नालीवरील स्लॅब काही दिवसातच कोसळला अनेक ठिकाणी नालीवर भगदाड पडल्याने वाहन धारक नागरीकांना धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे या कामाची पाहणी करावी व गुणवत्ता पुर्ण काम करण्याबाबत संबधितांना सुचना द्याव्या अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला आहे.
आज मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर, मराठवाड्यातील, छत्रपती संभाजीनगर, तसेच विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
यवतमाळ पालिकेच्या विद्युत विभागातील निविदा प्रक्रियेबाबत झालेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निविदा दस्तऐवजांमध्ये संभाव्य छेडछाडीबाबत गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती नितीन डब्ल्यू सांबरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमोर झाली या प्रकरणात यवतमाळ जिल्हाधिकारी तसेच पालिकेचे मुख्याधिकारी यांना नोटीस देऊन उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागच्या आठ दिवसात वादळी वारे व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या बागायती पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले होते प्रशासनाच्या आदेशानंतर कृषी सहायकांनी शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतात दाखल होत या संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करून शासनाला अहवाल सादर केला आहे यामध्ये केळी बागांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली असून केळी उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे
धाराशिव मध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
दरम्यान समीतीच्या निष्क्रियतेमुळे जात वैधता प्रमाणपत्राच्या शेकडो फायली प्रलंबित आहेत या फायली निकाली काढल्या जात नसुन तारीख पे तारीख देत अडवणूक केली जात आहे.
समीतीमधील अधिकारी गैरसमज राहत असल्याने संतप्त मराठा समाजाच्या तरुणांनी ठिय्या आंदोलन केले
दरम्यान पुढील आठवड्यात वैयक्तिक दाव्यानुसार सुनावणी घेण्याचे आश्वासन संबधित सदस्यांनी दिल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले तर जात प्रमाणपत्र पडताळणीच्या कामाला गती द्यावी,
दिलेल्या वेळी आठवड्यातील ठरावीक दिवशी तिन्ही सदस्यांची कार्यालयातील एकञित उपस्थिती बंधनकारक करावी आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.
भिवंडीतील कल्याण नाका घुंघट नगर परिसरात राहणाऱ्या एका मुस्लिम युवकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. .
चाहे जो हो जाये सपोट बस पाकिस्तान को करेंगे ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भिवंडी शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत युवकाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागच्या आठ दिवसात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना आता याच वातावरण बदलाचा फटका पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून अचानक पपईच्या बागांवर बुरशीजन्य रोगाने आक्रमण केले आहे यामुळे हातात तोंडाशी आलेल्या पपई बाग नष्ट होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत दरम्यान कृषी विभागाच्या कृषी अधिकाऱ्यांसह कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन यावेळी शेतकऱ्यांनी केले आहे
उन्हाळ्याच्या शेवटच्या महिन्यात हिंगोली शहरात भीषण पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे
या पाणीटंचाईचे अधिक चटके बसत असल्याने नागरिक टँकरद्वारे पाणी खरेदी करत आहेत,
सध्या हिंगोली 80 पेक्षा जास्त टॅंकर ऍक्टिव्ह असून, प्रति टँकर 800 ते हजार रुपये दराने नागरिक पाण्याची खरेदी करत आहेत
दरम्यान हिंगोली पालिकेने नागरिकांना पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा दर पाच दिवस आड सुरू केल्याने पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी देखील नागरिकांची भटकंती सुरू आहे
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा शहरातील शासकीय धान्य गोदामाजवळ नगरपंचायतीने उभारलेल्या घनकचरा प्रकल्पामुळे परीसरात अस्वच्छता व दुर्गंधीमुळे आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत
या घनकचरा प्रकल्पाची ठाकरे गटाचे आमदार प्रविण स्वामी यांनी पाहणी करुन नगरपंचायत च्या कामावर नाराजी व्यक्त केली.
तर पावसाळा तोंडावर आला असुन अशा स्थितीत दुर्गंधी व संसर्गजन्य रोगांचा धोका अधिकच वाढु शकतो
त्यामुळे तातडीने कचर्याचे योग्य विलगीकरण, निर्जंतुकिकरण व्यवस्थापन सुधारणा व आराखड्याचे पुनर्मूल्यांकन व्हावे अन्यथा याची जबाबदारी संबधित अधिकाऱ्यांवर निश्चित केली जाईल असा इशारा दिलाय
तर यावेळी अधिकारी व ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे बागायती आणि फळबागांची 20 कोटींची नुकसान झालं आहे.
नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे.जालना जिल्ह्यात 5 आणि 6 मे रोजी वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस आणि गारपीटीमुळे नुकसान झालं होत .
नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून यात जालना, बदनापूर आणि परतुर तालुक्यातील 184 गावातील 2638 शेतकरी बाधित झाले असून 1133 हेक्टर बागायती तर 789 हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान हा नुकसानीचा प्राथमिक अंदाज असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अहवालात बदल होऊ शकतो अशी माहिती प्रशासनाने दिली आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.