
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना जालना जिल्हासह महाराष्ट्रात बंदी घालावी, ही मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केलीय. सदावर्तेंना महाराष्ट्रात बंदी घालावी या मागणीसाठी जालन्यातील रामनगर आणि परिसरातील नागरिकांनी आज अंबड चौफुली ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला. अँड गुणरत्न सदावर्ते हे जालन्यात येऊन जाती-जातीमध्ये वाद लावण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील यावेळी आंदोलकांनी केलाय.
काही दिवसापूर्वी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी जालन्यात येऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी रामनगर येथील जुन्या वादातून झालेल्या वादाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप निवेदनकर्त्यांनी केलाय. दरम्यान आज जालन्यातील रामनगर आणि परिसरातील नागरिकांनी एकत्र येत अंबड चौफुली ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्ते हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. मनोज जरांगे यांच्यामुळेच मराठा समाजाचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला.
त्यामुळे जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडावा, असा सल्ला गुणरत्न सदावर्ते यांनी दिला होता. सदावर्ते हे लातूर दौऱ्यावर होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना आरोपही केले. मनोज जरांगेंमुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान झालंय. आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्लूएसच्या माध्यमातून मिळणारे मराठा विद्यार्थ्यांचे आरक्षण गेलंय. त्यामुळे आता पाच टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण मराठा विद्यार्थ्यांना मिळत आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा नाद सोडावा, असे सदावर्ते यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.