

बारामती जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्ताने काटेवाडीत संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं..त्यातच रोहित पवारांनी 12 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन विलिनीकरणाबाबत अजितदादांची नेमकी काय इच्छा होती? हे उघड करणार असल्याचं सांगितलयं...
विलिनीकरणावर बोलण्याचा रोहित पवारांना नैतिक अधिकार नाही, असं म्हणणाऱ्या सुनील तटकरेंनाही त्यांनी चांगलचं सुनावलयं...दरम्यान विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेतली, असं विधान तटकरेंनी केलयं...
दरम्यान सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून झालेल्या टीकेवर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफांनी विरोधकांना चांगलचं सुनावलयं..एवढंच नाही तर शपथविधी व्हावा ही पवार कुटुंबाची इच्छा होती, असा दावाही त्यांनी केलाय...
शरद पवारांनीही मुख्यमंत्री विलिनीकरणाच्या चर्चेत नव्हते त्यामुळे त्यांना यात बोलण्याचा काय अधिकार असं म्हणत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा अधोरेखित केला होता... त्यामुळे आता विलिनीकरणानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत राज्याचा कारभार तसाच सुरु ठेवणार का? हे विलिनीकरण भविष्यात दोन्ही पक्षांसाठी कसं फायदेशीर ठरणार? हे पाहण महत्वाचं असेल..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.