
लातूर जिल्ह्यात घरगुती गॅस बरोबर व्यावसायिक गॅसचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे, जिल्हा प्रशासनाच्या वतीने गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाभरात दहा पथक तैनात करण्यात आली आहे. घरगुती गॅसचा वापर हॉटेल व्यवसायात करणे, तसेच घरगुती वापराशिवाय इतर ठिकाणी गॅसचा वापर करणे यावर या पथकाची करडी नजर असणार आहे. तसेच कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या गॅस एजन्सीवर देखील या पथकाकडून कारवाई करण्यात येणार आहे, तर रात्री औसा शहरात अनेक हॉटेलमध्ये घरगुती गॅस वापरात असल्याची माहिती समोर आली, या हॉटेलवर कारवाई करत आठ घरगुती गॅस सिलेंडर पथकाने ताब्यात घेतले आहेत.
अमेरिका इराण युद्धाचा परिणाम कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांवर हे पाहायला मिळत आहे.धाराशिव मध्ये शेतकऱ्याकडून कलिंगड घ्यायला व्यापारी टाळाटाळ करत आहेत.युद्धामुळे कलिंगड विकत नाहीत त्यामुळे ठरलेले व्यवहारही पूर्ण करायला व्यापारी नकार देत असून शेतातच कलिंगड पडून आहे.व्यवहार ठरूनही आता व्यापारी फोनही घ्यायला तयार नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. एकीकडे युद्धाचं कारण आणि दुसरीकडे अवकाळी पावसाचा अंदाज असल्याने शेतकरी चिंतेत आहे. मोठ्या कष्टाने कलिंगड पिकवलं यावेळी बाजारात भावही होता मात्र आता व्यापारीच फिरकत नाहीत. त्यामुळे कलिंगडासाठी केलेला खर्चही निघतो का नाही हे चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
- पाणी मागणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेला ‘मुले चोरणारी’ समजून जमावाकडून मारहाण.
- मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
- वृद्ध महिला रुग्णालयातून औषधे घेऊन घरी परतत असताना थकव्यामुळे रस्त्याकडेला थांबल्या.
- औषध घेण्यासाठी त्यांनी जवळ खेळणाऱ्या मुलाकडे पिण्याचे पाणी मागितले.
- मराठी किंवा हिंदी न येता त्यांनी भोजपुरी भाषेत संवाद साधल्याने गैरसमज निर्माण.
- परिसरातील एका महिलेने मुलाला पळवण्याचा आरोप करत आरडाओरडा केला.
- जमावाने कोणतीही शहानिशा न करता महिलेला बेदम मारहाण केली.
- पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला सुरक्षित बाहेर काढले.
- चौकशीत महिला निर्दोष असल्याचे स्पष्ट अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस एजन्सीवर समोर नागरिक गॅस सिलिंडर घेण्यासाठी रांगा लावत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत असून यवतमाळ जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा पुरेसा उपलब्ध असल्याने गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी टाळावी तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी नागरिकांना केले आहे.
सांगलीच्या मिरज मधील सुभाषनगर येथे किरकोळ कारणातून दोन गट आमने-सामने आल्याने जोरदार राडा झाला. यावेळी झालेल्या हाणामारीमध्ये धारदार हत्यारांचा वापर झाल्याने सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुभाषनगर परिसरामध्ये दोन तरुणांमध्ये रस्त्यावरून जाण्याच्या कारणातून किरकोळ वाद झाला. यानंतर दोन तरुणांकडून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. यानंतर दोन गट आमने-सामने आल्याने एकमेकांना धारदार हत्यारांच्या साह्याने हल्ला करण्यात आला. यावेळी एका गटातील सहा जण जखमी झालेत. तसेच यावेळी घरावर दगडफेक करून हत्याराच्या साह्याने वाहनांची तोडफोडही करण्यात आली. दोन गट आमने-सामने आल्याने सुभाषनगर परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात आज निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळाला. जावळी तालुक्यातील रानगेघर, करंदी, दरे आणि मेढा परिसरात दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास अचानक गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. साधारण तासभर चाललेल्या या पावसाने काढणीला आलेल्या गहू ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे.
दुपारपर्यंत कडक ऊन असताना अचानक आकाशात ढग जमा झाले आणि पाऊस सुरू झाला.या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.
घटनेनंतर पोलीस पथक घटनास्थळी तात्काळ दाखल
परवानाधारक व्यक्तीकडून बंदूक साफ करत असताना फायर झाल्याचा प्राथमिक अंदाज
बंदुकीतून फायर झालेल्या गोळीने महिलेच्या हाताला गोळी घासून गेल्याने महिला थोडक्यात बचावली
आरोपीच्या दुकानातून सुटलेली ही लहान आकाराची गोळी महिलेच्या हाताला चाटून पुढे एका घराच्या पत्र्याला जाऊन धडकल्याचे तपासात निष्पन्न
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांतर्फे करण्यात आले आवाहन
संबंधित आरोपी विरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
मावळच्या देहुरोड शहरात आगामी रमजान ईदचा सण शांततेत व सलोख्याच्या वातावरणात पार पडावा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रसंग उद्भवू नये यासाठी देहुरोड पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस देहुरोड पोलीस ठाणे हद्दीतील मुस्लिम समाजातील ९ मशिदींचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. बैठकीदरम्यान ईदच्या पार्श्वभूमीवर ट्राफिक व्यवस्थापन, पार्किंगची व्यवस्था, परिसरातील CCTV कॅमेरे बसविणे तसेच नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवांची उपलब्धता आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सण शांततेत आणि सुव्यवस्थितरीत्या पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन व समाजातील पदाधिकाऱ्यांनी परस्पर सहकार्य करण्याचे आवाहन सहायक पोलीस उपायुक्त बाळासाहेब कोपणर तसेच पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.