

हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मी यांना धन, समृद्धी आणि सौभाग्याची देवी मानण्यात येतं. लक्ष्मी देवेची ज्यांच्यावर कृपा असते त्यांच्या आयुष्यात कधीही धनाची कमतरता भासत नाही असं मानण्यात येतं. शास्त्रांनुसार दिवसातील एक विशिष्ट वेळ अशी असते ज्यावेळी देवी लक्ष्मी घरात प्रवेश करतात. त्या वेळी काही चुका टाळणे अत्यावश्यक असते, अन्यथा लक्ष्मीची कृपा कमी होऊ शकते.
शास्त्रांनुसार, देवी लक्ष्मीचा घरात प्रवेश संध्याकाळी म्हणजे गोधूलि वेळेला मानला जातो. हा वेळ साधारण सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंतचा असतो. या काळात काही विशेष उपाय केल्यास घरात सुख-समृद्धी आणि सौभाग्याचं आगमन होतं.
सूर्यास्तानंतर काही वेळ घराचं मुख्य द्वार खुलं ठेवणं शुभ मानण्यात येतं. यामुळे देवी लक्ष्मीचं स्वागत होतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा, शांती व समृद्धीचा प्रवाह वाढतो.
संध्याकाळी घर स्वच्छ ठेवणं अत्यावश्यक आहे. असं मानलं जातं की, स्वच्छ घरातच देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घरातील कोणताही कोपरा अंधारात ठेऊ नका. त्याचप्रमाणे घरात कोणत्याही ठिकाणी अस्वच्छपणा राहू नये.
घराच्या मुख्य द्वारावर आणि मंदिरात संध्याकाळी तुपाचा दिवा लावणं शुभ मानण्यात येतं. हे देवी लक्ष्मीच्या स्वागताचे प्रतीक असून घरात सुख-समृद्धी आणि सौभाग्य स्थिर राहतं.
संध्याकाळी तुलसीच्या रोपाला स्पर्श करणं किंवा हात लावणं अशुभ मानण्यात येतं. कारण हा वेळ विश्रांतीचा असतो आणि तुलसी देवीची पूजा रात्री केली जात नाही. त्याचप्रमाणे संध्याकाळी धनाचे व्यवहार करणंही टाळलं पाहिजे. कारण यामुळे घरातील लक्ष्मी दूर जाऊ शकते आणि आर्थिक स्थैर्य कमी होऊ शकणार आहे.
संध्याकाळी घरात शांतता आणि सौहार्द राखणं अत्यावश्यक आहे. या वेळी वाणी आणि वर्तनावर संयम ठेवणाऱ्या व्यक्तीच्या घरात माता लक्ष्मीचा स्थायी वास होतो आणि सुख-समृद्धी कायम राहतं.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.