रसिकांसाठी अत्यंत वाईट बातमी! संगीताचा एक 'सुवर्णकाळ' संपला; पंतप्रधान मोदींनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

Gaurang Vyas Death : ज्येष्ठ गुजराती संगीतकार आणि गायक गौरांग व्यास यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी अहमदाबाद येथे निधन झाले. १०० हून अधिक चित्रपटांना संगीत देणाऱ्या गौरांग व्यास यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
Gaurang Vyas passes away at 87 latest news
Gaurang Vyas passes away at 87 latest news Saam TV marathi News
Published On

Gaurang Vyas passes away at 87 latest news : गुजराती संगीताला एक नवी ओळख देणारे ज्येष्ठ संगीतकार गौरांग व्यास यांनी जगाचा निरोप घेतला आहे. अनेक सुपरहिट गाण्यांना संगीत देणाऱ्या गौरांग यांच्या निधनामुळे संगीताचा एक सुवर्णकाळ संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. गौरांग यांच्या निधनामुळे संगीताचा एक सुवर्णकाळ संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या संगीतातील योगदानाचे स्मरण करत त्यांना आदरांजली अर्पण केली.

संगीतकार आणि गायक गौरांग व्यास यांचे अहमदाबाद येथे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. गुजराती चित्रपट आणि लोकसंगीताच्या विश्वातील ते एक अत्यंत मोठे नाव होते. प्रसिद्ध संगीतकार अविनाश व्यास यांचे ते सुपुत्र होते. आपल्या वडिलांचा संगीताचा वारसा पुढे नेऊन त्यांनी अनेक दशके संगीत क्षेत्रात अधिराज्य गाजवले.

Gaurang Vyas passes away at 87 latest news
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! AC लोकलबाबत रेल्वेमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा; जाणून घ्या पहिली ट्रेन कधी सुरू होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर गौरांग व्यास यांच्यासोबतचा फोटो शेअर करत तीव्र दुःख व्यक्त केले. "गुजराती संगीत क्षेत्रातील प्रख्यात संगीतकार श्री गौरांग व्यास यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे. वडिलांची संगीत परंपरा पुढे नेत त्यांनी स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनाने गुजरातने एक प्रतिभावान संगीतकार गमावला आहे. त्यांचे अमूल्य योगदान सदैव स्मरणात राहील," अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Gaurang Vyas passes away at 87 latest news
'NCMC' कार्डमुळे ST चा स्वस्त प्रवास महागात पडतोय, सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड

१०० हून अधिक चित्रपट आणि दिग्गज गायकांसोबत काम

'जेसल तोरल' या चित्रपटात वडिलांचे सहाय्यक म्हणून गौरांग व्यास यांनी काम सुरू केले आणि 'लखो फुलानी' चित्रपटातून स्वतंत्र संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले. यामध्ये 'भवनी भवाई', 'मणियारो', 'नसीबानी बलिहारी', 'पार्की थापन', 'लिलुडी धरती' आणि 'मैयारामन मांडू नथी लगटू' यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांचा समावेश आहे.

लता मंगेशकर, आशा भोसले, किशोर कुमार, मन्ना डे, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, भूपिंदर सिंग आणि प्रफुल्ल दवे यांसारख्या महान गायकांनी त्यांच्या संगीतावर गाणी गायली आहेत. गौरांग व्यास यांची "मनियारो ते हालू हलू थाई रे वियो" आणि "हू तू तू तू, जामी रामतानी रुतू" ही गाणी प्रचंड गाजली. याशिवाय त्यांनी 'जलारामनी झुंपडी', 'भजन अनमोल', 'गंगा सतीना भजने', 'कहाट कबीर', 'प्राचीन प्रभातियां' आणि 'नॉन-स्टॉप दांडिया-रास' यांसारखे अनेक गाजलेले संगीत अल्बमही दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com