

उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नानंतर उघड झालेल्या थरारक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडालीये. आनंदाच्या भरात पार पडलेलं हे लग्न काही दिवसांतच वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. यावेळी तरूणाने आपलं लग्न तृतीयपंथीशी लग्न झाल्याचा आरोप केला आहे.
या घटनेमध्ये एक तरूणाला लग्नाच्या रात्री जे समजलं ते फारच धक्कादायक होतं. ज्या महिलेसोबत त्याने सप्तपदी घेतली होती ती महिला नसून तृतीयपंथी होती. ही घटना कळताच कुटुंबियांच्या आनंदावर विरजण पडलं. या घटनेनंतर तरूणाने पोलीस स्टेशन गाठलं असून फसवणूकीची तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या तरुणाचं २५ मार्च रोजी बिछवा भागातील एका गावातील तरुणीसोबत थाटामाटात लग्न झालं. लग्नसोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. दुसऱ्या दिवशी वधूला सासरी आणल्यानंतर घरात आनंदाचं वातावरण होतं.
मात्र, या आनंदावर काही वेळातच विरजण पडलं. लग्नानंतर दोन दिवसांनी म्हणजे २८ मार्च रोजी नवऱ्याला एक धक्कादायक गोष्ट समजली. त्याने केलेल्या आरोपानुसार, ज्याला तो पत्नी म्हणून घरी घेऊन आला ती तृतीयपंथी असल्याचं त्याला कळलं. ही बाब समजताच त्याच्यासह संपूर्ण कुटुंब हादरलं.
या घटनेनंतर तरुणाने आपल्या कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. कुटुंबाने एकत्रित चर्चा करून पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. या तरुणाने किशनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केलेत. त्याचा आरोप आहे की, लग्नाआधी किंवा लग्नाच्या वेळी ही महत्त्वाची माहिती जाणूनबुजून लपवण्यात आली आणि त्याची फसवणूक करून हे लग्न लावण्यात आलं.
तरुणाच्या तक्रारीनुसार, ही गोष्ट उघड झाल्यानंतर नववधू तिच्या माहेरी परतली आहे. लग्नात मिळालेले दागिने आणि रोख रक्कमही ती सोबत घेऊन गेली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे मानसिक धक्का बसलेल्या तरुणाने पोलिसांकडे तात्काळ कारवाईची मागणी केलीये. किशनी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.