देश विदेश

Parliament winter Session: पाकव्याप्त काश्मीर भारतात असता...; अमित शहांनी लोकसभेत सांगितल्या नेहरूंनी केलेल्या दोन मोठ्या चुका

Bharat Jadhav

Union Home Minister Amit Shah In Parliament winter session:

संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झाल असून अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज होत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत जम्मू-काश्मीर, जम्मू-काश्मीर आरक्षण दुरुस्ती विधेयक-२०२३ आणि जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक- २०२३ या दोन विधेयकांवर उत्तर दिलं. या दरम्यान शाह यांनी पंडित नेहरू यांनी घेतलेल्या निर्णयावरून काँग्रेसवर निशाणा साधला.(Latest News)

पाकव्याप्त काश्मीरची समस्या दिवंगत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू याच्यामुळे उपस्थित झाली. पूर्ण कश्मीर ताब्यात घेण्याआधीच त्यांनी शस्त्रसंधीचा निर्णय घेतला, नाहीतर पीओके आज भारताचा भाग असता. नेहरु यांच्या चुकीमुळे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) बनलं,असं म्हणत शाह यांनी काँग्रेसवर टीका केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बिल सादर करताना असताना अमित शाह यांनी नेहरू यांनी घोडचुका केल्याचं म्हटलं. जेव्हा युद्ध चालू होते त्यावेळी आपलं सैन्य जिंकत होते. सैन्य पंजाबच्या पुढे गेले त्यानंतर शस्त्रसंधीचा निर्णय घेतला. त्यामुळे पीओकेचा जन्म झाला. जर शस्त्रसंधीचा निर्णय तीन दिवसानंतर घेतला असता तर पीओके आपल्या देशाचा भाग राहिला असता. पण तसं झालं नाही. ही नेहरूंची पहिली चूक होती.

तर दुसरी चूक म्हणजे जवाहरलाल नेहरूंनी भारताचा अंतर्गत मुद्दा UN मध्ये नेला. या इतिहासातील घोडचुका असल्याचं शहा म्हणालेत. शाह यांनी केलेल्या विधानामुळे सभागृहात मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर विरोधकांनी सभागृहातून वॉकआउट केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक, २०२३ आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक, २०२३ आणि लोकसभेत मांडले.

आता जम्मू-काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक आता लोकसभेत मंजूर झाले आहे. गेल्या ७० वर्षात काश्मीरमध्ये ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना न्याय देण्यासाठी हे विधेयक सादर करण्यात आले आहेत. तर अनुच्छेद ३७० मुळे ४५ हजार लोकांचा जीव गेला, अशा यंत्रणेला आमच्या सरकारने तेथून काढून टाकले. काश्मिरी पंडितांना जेव्हा टार्गेट करण्यात येतं होतं, त्यावेळी त्यांना तेथून स्थलांत्तर करावे लागले होते.

काश्मिरी पंडितांना देशातील इतर भागात शरणार्थी सारखं राहवे लागले होते. विस्थापित काश्मिरी पंडितांना आरक्षण देऊन काय होणार? विरोधकांच्या या प्रश्नावर शाह यांनी उत्तर दिलं. काश्मिरी पंडितांना आरक्षण देऊन त्यांचा आवाज काश्मीर विधानसभेत ऐकू येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT