Mahant Narayangiri On Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Mahant Narayangiri: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते, उद्धव ठाकरेंनीच धोका दिला : महंत नारायणगिरी

Mahant Narayangiri On Uddhav Thackeray: शंकराचार्य आणि उद्धव ठाकयांच्या भेटीवर आता महंत नारायणगिरी यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनीच धोका दिला, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Priya More

गिरीष कांबळे, मुंबई

उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातील जनतेसोबत विश्वासघात झालाय असे वक्तव्य जगद्गुरू शंकराचार्य (swami-avimukteswarananda-shankaracharya) यांनी केले होते. त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर देखील टीका केली होती. शंकराचार्य आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीवर आता महंत नारायणगिरी यांनी निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होणार होते. पण उद्धव ठाकरे यांनीच धोका दिला, असल्याचे वक्तव्य महंत नारायणगिरी यांनी केले आहे.

महंत नारायणगिरी यांनी सांगितले की, श्रीशंकराचार्यजी उद्धव ठाकरेंकडे गेले होते. शंकराचार्य साधारण व्यक्तींकडे कधी जात नाही. मात्र उद्योगपती मोठ्या विवाहात जातात. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला धोका दिला. नाहीतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार होते. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारधारेला तिलांजली दिली आणि विरुद्ध विचारधारेसोबत ते गेलेत. शंकाराचार्य अशा लोकांच्या घरी जाऊन म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंना धोका दिला. मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदू समाजाला धोका दिला.

'शंकराचार्यंचा आदर करतो, धर्म आणि राष्ट्रापेक्षा कोणताही संत मोठा नसतो. जय -पराजय हे आम्ही सांगायला नको. ते काम जनतेचं आहे. आमचे काम पूजापाठ करण्याचे आहे. आम्ही कोणाला धोकेबाज म्हणतो, विश्वासघातकी म्हणतो, अशी विधानं देताना विचार केला पाहिजे. उद्धव ठाकरे विद्रोहीसोबत गेले आहेत. त्यांच्या घरी जात त्यांना आशीर्वाद देणे आणि भेट घेणे चुकीचं आहे.', असे मत देखील महंत नारायणगिरी यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT