दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीनंतर आता विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज करत आहेत. दरम्यान, दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना अपयश आले आहे. परंतु तरीही या विद्यार्थ्यांनी खचून जावू नये. दहावीच्या नापास विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एटीकेटी परीक्षा घेण्यात येणार आहे.
दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर यामध्ये ८६ हजार ६४१ विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी पात्र आहेत. तर ३४ हजार ३९३ विद्यार्थी एटीकेटीसाठी पात्र असल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे.
दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २४ जून ते १७जुलै दरम्यान पुरवणी परीक्षा(Supplementary Examination) घेण्यात येणार आहे.
एटीकेटीसाठी (ATKT) पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा होणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. पुरवणी परीक्षेतून दर्जा सुधारण्याची अन् उत्तीर्ण होण्याची संधी मिळणार आहे.
दहावीच्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना ३५ पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. त्यामुळे त्यांना अकरावीसाठी प्रवेश घेता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा दहावीची परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. या परीक्षेत पास झाल्यानंतर तुम्ही अकरावीसाठी प्रवेश घेऊ शकणार आहात. त्यामुळे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला पुन्हा एकदा पुरवणी परीक्षा देता येणार आहे.
दहावीचा निकाल लागला आहे. यंदा दहावीचा निकाल गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत खूप कमी लागला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत तर अनेक विद्यार्थी काठावर पासदेखील झाले आहेत. काही विद्यार्थी नापासदेखील झाले आहेत. नापास झालेले विद्यार्थी लगेच टेन्शन घेतात. परंतु तुमच्यासाठी पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाणार आहे. तुमची पुरवणी परीक्षा ४ जून ते १७जुलै या कालावधीत होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.