Virendra Jagtap Saam tv
महाराष्ट्र

Virendra Jagtap : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर; वर्ध्यात काँग्रेस नेत्याचे स्पष्ट संकेत

Wardha News : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला काही प्रमाणात यश मिळाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पुन्हा पीछेहाट झाली. नुकतच काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन हे अहमदाबाद येथे पार पडले

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: संघटन मजबूत असेल तरच पक्षाचे अस्तित्व टिकून असेल असं पक्षाचं आहे. युती आघाडीमध्ये ज्या जागा आपण मित्र पक्षांना सोडतो. तेथे पक्ष संघटना कमजोर झालेली दिसत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे आपले पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढवेल; असे स्पष्ट संकेत असल्याचे काँग्रेसचे वर्धा जिल्हा निरीक्षक तथा माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला काही प्रमाणात यश मिळाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पुन्हा पीछेहाट झाली. नुकतच काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन हे अहमदाबाद येथे पार पडले. यात काँग्रेसचे संघटन वाढविण्याच्या दृष्टीने काम करण्याचे नेत्यांना आदेश देण्यात आले. महाराष्ट्रात जिल्हानिहाय काँग्रेसने पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. वर्धा जिल्हा निरीक्षक म्हणून माजी आमदार वीरेंद्र जगताप यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आढावा घेतला.   

वर्धेच्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सदभावना भवनात काँग्रेसची आढावा पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांच्यासह सर्व ब्लॉक अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जगताप यांनी पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसची पुढील भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसचे अहमदाबाद येथील राष्ट्रीय अधिवेशनामध्ये पक्षाने संघटनात्मक बांधणीवर भर देण्याचे ठरवले आहे.

वर्धा जिल्ह्यातला आर्वी, हिंगणघाट विधानसभेची स्थिती आहे. आर्वीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून खासदार झाले. तेथे काँग्रेसचे संघटनेच काम कमी होत आहे. अशीच स्थिती हिंगणघाट विधानसभेची आहे. यामुळे सगळ्या तालुक्यात स्वबळावर नगरपरिषद, जिल्हा परिषद लढा असा पक्षाच पुढचं धोरण आहे. 

विदर्भात तरी काँग्रेस स्वबळावर लढणार 

विदर्भात काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत आहे. पहिले स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढू, असे स्पष्ट संकेत पक्ष संघटनेचे आहे. तर निवडणुकीनंतर काही जागा कमी पडत असतील, तर मग मित्र पक्षांची आघाडी करून सत्तेत येण्याचा प्रयत्न करू. कारण कार्यकर्ता टिकला पाहिजे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांला न्याय मिळाला पाहिजे; असं पक्षाने ठरवलं असल्याचही जगताप यांनी बोलून दाखवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT