Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News : सुट्यांमध्ये मामाच्या घरी आला; खेळता खेळता घरात जात उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon News : स्वप्नील पाटील हा शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे मामाकडे आला होता. मागील काही दिवसांपासून स्वप्नील हा मामाकडे होता.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : उन्हाळी सुट्या असल्याने मामाच्या घरी आलेल्या मुलाने गळफास घेत जीवनयात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे. ही घटना (Jalgaon) जळगाव तालुक्यातील कुसुंबा या गावात घडली असून स्वप्नील दीपक पाटील (वय १५) असे मृत मुलाचे नाव आहे. 

बाळद (ता. पाचोरा) येथील असलेला स्वप्नील पाटील हा शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे मामाकडे आला होता. मागील काही दिवसांपासून स्वप्नील हा मामाकडे होता. दरम्यान १० मे रोजी सकाळी सर्व मुले बाहेर खेळत होती. त्यांच्यासोबत स्वप्नील देखील होता. खेळात असताना तो घरात आला व वरच्या मजल्यावरील रूममध्ये जात त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.  

दरम्यान दुपारी एकच्या सुमारास त्याची आजी त्याला बोलवायला गेली असता खोलीचे दार आतून बंद होते. दार उघडत का नाही म्हणून आजीने आरडाओरड केली. यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेत दरवाजा तोडला. तेव्हा, स्वप्नील हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Jalgaon Medical Collage) दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT